राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बोलवण्यात आलेल्या एकदिवसीय राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी मात्र या विधेयकावर शंका व्यक्त केली. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे. आमच्या कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्या मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी सरकारने सगेसोयऱ्यांसंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारने त्वरीत करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. ते ओबीसी आरक्षणावर ठाम आहेत. याच पार्श्वभूवर जरांगे यांनी मराठा समाजाला उद्या (२१ फेब्रवारी) अंतरवाली सराटी येथे जमण्यास सांगितले आहे. उद्या दुपारी १२ वाजता मराठा समाजाची येथे बैठक होणार असून या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. अशी माहिती जरांगे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे काय म्हणाले?

“आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान, आदर केला. त्यामुळेच आम्ही सरकारला सहा महिन्यांचा वेळ दिला होता. आम्हाला समाज महत्त्वाचा आहे. आम्ही प्रत्येक वेळी भावनेत अडकून निर्णय घेऊ शकत नाही. मी माझ्या जातीच्या तरुणांचं नुकसान करू शकत नाही. त्यांना सरकार चालवताना जशा मर्यादा आहेत, त्याच पद्धतीने मलादेखील काही मर्यादा आहेत. नुसत्या आश्वासनाने आमच्या मुलांचं भविष्य घडणार नाही. पोरांना अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात. वयाचे २५ वर्षे मुलं शिक्षणात घालतात. मात्र ऐनवेळी तो नोकरीपासून मुकतो,” असे मनोज जरांगे म्हणाले.

“मराठा समाजाचा अपमान केला जातोय”

“आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे. कोणत्या पद्धतीने आरक्षण द्यायचे आहे, ते सरकारने ठरवावे. सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेविरोधात ज्या हरकती आलेल्या आहेत, त्याबाबत सरकारने काय ठरवायचे ते ठरवावे. मंत्रिमंडळाला काय अधिकार असतात हे मला माहिती आहे. हरकतीचा विषय पुढे करून मराठा समाजाचा अपमान केला जात आहे. मराठा समाजाला हक्कापासून दूर ठेवले जात आहे. हे चुकीचे आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची त्वरीत अमंलबजावणी करावी,” अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

“…तर एका रात्रीत निर्णय होऊ शकतो”

“आम्ही वेळ दिला सयंम ठेवला. पण आम्हाला सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. आमचा हा हट्टीपणा नाही. लोकशाहीत मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली आहे. याच अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आमची मागणी आहे. आम्ही घाईगडबड करत नाही. हरकतींवर निर्णय घेण्यासाठी सरकारने मनुष्यबळ वाढवावे. एका रात्रीत निर्णय होऊ शकतो. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत,” असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.

“उद्याची निर्णायक बैठक, सर्वांनी यावे”

“उद्या अंतरवाली सराटीमध्ये दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे. ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी या बैठकीला यावे. मी तर म्हणेन या बैठकीला सर्वांनीच यावे. कारण उद्याची बैठक ही निर्णायक असणार आहे. कारण आपल्या मुलांना न्याय हवा असेल तर लढावे लागणार आहे. उद्या आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान, आदर केला. त्यामुळेच आम्ही सरकारला सहा महिन्यांचा वेळ दिला होता. आम्हाला समाज महत्त्वाचा आहे. आम्ही प्रत्येक वेळी भावनेत अडकून निर्णय घेऊ शकत नाही. मी माझ्या जातीच्या तरुणांचं नुकसान करू शकत नाही. त्यांना सरकार चालवताना जशा मर्यादा आहेत, त्याच पद्धतीने मलादेखील काही मर्यादा आहेत. नुसत्या आश्वासनाने आमच्या मुलांचं भविष्य घडणार नाही. पोरांना अभ्यास करावा लागतो, कष्ट करावे लागतात. वयाचे २५ वर्षे मुलं शिक्षणात घालतात. मात्र ऐनवेळी तो नोकरीपासून मुकतो,” असे मनोज जरांगे म्हणाले.

“मराठा समाजाचा अपमान केला जातोय”

“आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे. कोणत्या पद्धतीने आरक्षण द्यायचे आहे, ते सरकारने ठरवावे. सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेविरोधात ज्या हरकती आलेल्या आहेत, त्याबाबत सरकारने काय ठरवायचे ते ठरवावे. मंत्रिमंडळाला काय अधिकार असतात हे मला माहिती आहे. हरकतीचा विषय पुढे करून मराठा समाजाचा अपमान केला जात आहे. मराठा समाजाला हक्कापासून दूर ठेवले जात आहे. हे चुकीचे आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबाबतच्या अध्यादेशाची त्वरीत अमंलबजावणी करावी,” अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

“…तर एका रात्रीत निर्णय होऊ शकतो”

“आम्ही वेळ दिला सयंम ठेवला. पण आम्हाला सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. आमचा हा हट्टीपणा नाही. लोकशाहीत मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. सरकारने सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढली आहे. याच अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आमची मागणी आहे. आम्ही घाईगडबड करत नाही. हरकतींवर निर्णय घेण्यासाठी सरकारने मनुष्यबळ वाढवावे. एका रात्रीत निर्णय होऊ शकतो. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत,” असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.

“उद्याची निर्णायक बैठक, सर्वांनी यावे”

“उद्या अंतरवाली सराटीमध्ये दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे. ज्यांना शक्य आहे, त्या सर्वांनी या बैठकीला यावे. मी तर म्हणेन या बैठकीला सर्वांनीच यावे. कारण उद्याची बैठक ही निर्णायक असणार आहे. कारण आपल्या मुलांना न्याय हवा असेल तर लढावे लागणार आहे. उद्या आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले.