मुखपृष्ठ >> महत्वाच्या बातम्या >> कामटे-मारिया वाद ; आर. आर. पाटील मध्यस्थी करणार
 


स्पर्धेचे नियम व अटी




कामटे-मारिया वाद ; आर. आर. पाटील मध्यस्थी करणार Bookmark and Share Print E-mail
सांगली, २८ नोव्हेंबर / प्रतिनिधी
शहीद आशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांच्या ‘टू द लास्ट बुलेट’ या पुस्तकातील संदर्भावरून गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याबाबत निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत. असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
आर. आर. पाटील म्हणाले की, राकेश मारिया हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यावर झालेल्या कथित गंभीर आरोपांनी पोलीसदल काहिसे द्विधा मनस्थितीत आले आहे. यासंदर्भातील वस्तुनिष्ठ परिस्थिती आपण विनिता कामटे व राकेश मारिया यांच्याकडून समजून घेऊ व निर्माण झालेला वाद संपुष्टात आणण्याची जबाबदारी आपण निश्चितपणे पार पाडू. पोलीस दलात कोणतेही मतभेद नाहीत, असे ते म्हणाले.
*जॅकेटच्या चौकशीचे आदेश             
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी दशहतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या हरवलेल्या बुलेटप्रूफ जॅकेट प्रकरणी त्यांच्या पत्नीची आपण केवळ माफी मागू शकतो, असे वक्तव्य केल्यानंतर खडबडून जागे झालेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हरवलेल्या जॅकेटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्यावेळी घातलेल्या जॅकेटच्या दर्जाबाबत व गहाळ होण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.  केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतरच आर. आर. पाटील यांनी जॅकेट हरविण्याच्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले  आहेत.    
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.