मुखपृष्ठ >> लेख >> साद घालती छायाचित्रे
 


स्पर्धेचे नियम व अटी




साद घालती छायाचित्रे Bookmark and Share Print E-mail
प्रतिनिधी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आशीष बुक सेंटरतर्फे  सुंदराबाई सभागृहात ४ ते २३ ऑगस्टदरम्यान विशेष पुस्तक प्रदर्शन
शंभर शब्दांपेक्षा एक छायाचित्र अधिक बोलके असते, असे म्हणतात. अर्थात, त्या छायाचित्राच्या जोडीला शंभर शब्द असतील तर त्याची परिणामकारकता नक्कीच वाढते हेही तितकेच सत्य आहे. ‘इंडिया ट्वेन्टी फोर अवर्स’ या पुस्तकात छायाचित्र आणि मोजके शब्द वापरून अखंड भारताची ओळख करून देण्यात आली आहे. हिमालय, अरबी समुद्र, राजस्थानचे वाळवंट आणि दक्षिणेतील मंदिरे ही भारताची भौगोलिक ओळख झाली. परंतु, भारतातील विविधता येथील माणसांमध्ये, त्यांच्या राहणीमानामध्ये, संस्कृतीमध्ये आहे. याचाच दृश्यानुभव हे पुस्तक पाहताना आणि वाचताना येतो. ही छायाचित्रे केवळ माहितीच देत नाहीत तर त्या ठिकाणी भेट देण्याचे अप्रत्यक्षरित्या आमंत्रणच देतात. आशीष बुक सेंटरतर्फे चर्चगेट येथील सुंदराबाई सभागृहात ४ ते २३ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनात हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
मायकल टोबियास हे या पुस्तकाचे लेख आहेत तर प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांच्या नेतृत्वाखाली १८ छायाचित्रकारांनी भारतभर फिरून भारताची ओळख करून देणारी छायाचित्रे टिपली आहेत. हे पुस्तक १९९६ साली प्रकाशित झालेले आहे. त्यामुळे पंधरा वर्षांपूर्वीचा भारत कसा होता, याची एक झलक हे पुस्तक पाहताना मिळते. चित्रपटांची पोस्टर, विश्वसुंदरीचा मुकुट घातलेली सुश्मिता सेन, आरशात चेहरा पाहतानाचा सुनील शेट्टी यांची छायाचित्रे पाहून भारतीय वाचक नक्कीच ‘नॉस्टॅल्जिक’ होईल. या छायाचित्रांचा संदर्भ काळाशी असला तरी गेल्या पंधरा वर्षांत अनेक गोष्टी ‘जैसे थे’च आहेत. त्यामुळे ‘इंडिया ट्वेन्टी फोर अवर्स’ या पुस्तकाला संग्रहमूल्य प्राप्त झाले आहे. या छायाचित्रकारांनी भारत अक्षरश: पिंजून ही छायाचित्रे जमा केली आहेत. मुख्य म्हणजे यात केवळ ‘प्रेक्षणीय स्थळां’चा संग्रह नसून जिवंत माणसांची छायाचित्रे असल्यामुळे हे पुस्तक भारताची अधिक जवळून ओळख देते. छायाचित्रासाठी म्हणून या माणसांनी पोझ दिलेली नसून छायाचित्रकाराने त्यांची नैसर्गिक पोझ टिपली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक छायाचित्राखाली त्या छायाचित्राशी संबंधित थोडक्यात पण रंजक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्या छायाचित्राला वेगळाच अर्थ प्राप्त होतो.
एकेक छायाचित्र पाहताना वाचकाची भारताशी नव्याने ओळख होते. कारण त्याला ज्ञात असलेल्या भारताच्या भूगोलावरून आणि संस्कृतीवरून अमूक एक छायाचित्र कोणत्या प्रदेशातील असेल, याचा वाचक अंदाज करत राहतो. त्यामुळे प्रत्येक छायाचित्राबद्दल वाचकाला आपसूकच एक उत्सुकता निर्माण झालेली असते. एका हमरस्त्यावरून हनुमानाचे रूप घेऊन चालणारा कलाकार, भर उन्हात थ्री पीस सूट परिधान करणारा कोणी एक गृहस्थ, मडक्यावर कलाकुसर करण्यात रमलेला कारागीर किंवा वध्र्याच्या विनोबा भावे यांच्या आश्रमात सूतकताई करणारी महिला अशी वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्या ठिकाणचे हे छायाचित्र आहे त्या ठिकाणाबद्दल, त्या वास्तुबद्दल किंवा शहराबद्दल थोडक्यात पण वैशिष्टय़पूर्ण माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. अडीच हजार रुपये किंमतीचे हे पुस्तक या प्रदर्शनात ५९५ रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एकीकडे भारताची ओळख करून देणारे ‘इंडिया ट्वेन्टी फोर अवर्स’ आहे तर दुसरीकडे जगभरातील अप्रतिम ठिकाणांची ओळख करून देऊन त्या ठिकाणी जाण्यासाठी वाचकांची उत्सुकता चाळविणारे ‘द वर्ल्डस् ग्रेटेस्ट प्लेसेस - द मोस्ट अमेझिंग डेस्टिनेशन्स ऑन अर्थ’ हे पुस्तकही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. हे पुस्तकही छायाचित्रांच्या माध्यमातूनच वाचकाशी संवाद साधते. एखाद्या देशात जाऊन काय पाहावे याची यादीच या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. जगभरातील कित्येक देशांची केवळ नावे ऐकलेली असतात. ते दिसता कसे, तेथील इमारती कशा असतात, मातीचा रंग कोणता, आकाश कसे दिसते याची काहीच कल्पना नसते. या पुस्तकातून मात्र याबाबतची साधारण कल्पना मिळून जाते. लिट्ल मर्मेड कॉमिक्स किंवा कार्टून स्वरूपात अनेकांनी पाहिलेली असतात. परंतु या मर्मेडचे शिल्प डेन्मार्कमधील कोपनहेगन बंदरात पाहायला मिळते. ‘मॅडागास्कर’ या नावाचा चित्रपट माहीत असतो. पण तेथील सृष्टी कशी आहे, याची झलक या पुस्तकात देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यॉर्कशायरमध्ये रंगणारी विविधरंगी संध्याकाळ, येमेनच्या राजधानाची नगररचना, थायलंडमधील आयुथ्थया येथे झाडात कोरलेले बुद्धांचे शिल्प इत्यादी छायाचित्रे पाहून त्या ठिकाणांना भेट द्यावीशी वाटली नाही तरच नवल! एका आयुष्यात जगभ्रमंती करणे ही तशी कठीणच गोष्ट आहे. पण किमान ही महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी हे पुस्तक वाटाडय़ा ठरू शकेल. या पुस्तकाची मूळ किंमत ३२०० रुपये असून या प्रदर्शनात हे पुस्तक १६०० रुपयांना मिळणार आहे.
आशीष बुक सेंटरचे दामजी निशार यांनी सांगितले की, या प्रदर्शनात एक लाख पुस्तके ठेवण्यात येणार असून सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. अधिक माहितीसाठी निशार यांच्याशी ९८२१५२०११७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.