भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
BJP corruption allegations against congress over commonwealth games
अन्वयार्थ : भाजपच्या आरोपांची विश्वासार्हता किती?

या घोटाळय़ावरून काँग्रेसला धोबीपछाड देणारा विरोधातील भाजप गेले दशकभर सत्तेत असूनही ईडीला या घोटाळय़ात कोणताही ठोस पुरावा सादर करता आलेला…

Congress deletes Gayab post targeting PM Modi after outrage
Congress : काँग्रेसने डिलिट केली पंतप्रधान मोदींवर टीका करणारी ‘गायब’ पोस्ट, नेमकं कारण काय?

काँग्रेसने सोशल मीडीयावर केलेल्या एका पोस्टमुळे वाद पेटला होता, मात्र पक्षाने ती पोस्ट आता डिलीट केली आहे.

Delhi Chief Minister Rekha Gupta On Delhi School
Delhi School : दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, शालेय शुल्क नियमन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी; खासगी शाळांच्या मनमानीला बसणार चाप?

आज दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शुल्क कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे.

Jalgaon BJP Controversy over appointment of party office bearers girish mahajan
जळगावात भाजप मंडल अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाद

आपण सांगू त्याच व्यक्तीची नियुक्ती मंडल अध्यक्ष पदावर करण्याचा हट्ट काही पदाधिकाऱ्यांनी धरल्यामुळे भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नाराजांची फळी…

Congress Gayab poster of PM Modi
Pahalgam Attack: “देश संकटात असताना नरेंद्र मोदी गायब”; काँग्रेसच्या एका पोस्टरमुळे भाजपाचा संताप, प्रकरण काय? प्रीमियम स्टोरी

Congress Gayab poster controversy काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे.

९६ वर्षीय कलाकार महिला पद्मश्री पुरस्कार जिंकताच नरेंद्र मोदींच्या कृतीने वेधलं लक्ष। Padmashri
९६ वर्षीय कलाकार महिला पद्मश्री पुरस्कार जिंकताच नरेंद्र मोदींच्या कृतीने वेधलं लक्ष। Padmashri

९६ वर्षीय कलाकार महिला पद्मश्री पुरस्कार जिंकताच नरेंद्र मोदींच्या कृतीने वेधलं लक्ष। Padmashri

Bharat Gogawale, Prashant Thakur, Aditi Tatkare,
Maharashtra Breaking Updates : भरत गोगावलेंच्या पालकमंत्रीपदाच्या इच्छेवर रोहित पवारांची खोचक टिप्पणी; म्हणाले, “आणखी अनेक वर्षं…”

Maharashtra News Today 29 April 2025 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

BJP State General Secretary MLA Randhir Savarkar criticize Vijay Wadettiwar anti-national thinking
‘‘विजय वडेट्टीवारांनी देशभक्तांच्या जखमांवर मीठ चोळले,’’ भाजप प्रदेश सरचिटणीसांची टीका; म्हणाले…

देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे थांबवा, अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

भाजपाने फटकाल्यानंतर काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा यु-टर्न, म्हणाले तसा अर्थ नव्हता…

हल्ल्यानंतर वातावरण तणावग्रस्त असताना अनेक काँग्रेस नेत्यांनी वादग्रस्त विधानं केल्यामुळे भाजपाचा रोष वाढला आहे. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आणि पाकिस्तानला क्लीन…

Former BJP corporators Suneesh Joshi and Mrinal Pendse submitted a letter to Municipal requesting to provide playgrounds for local children to play
नौपाड्यात मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्या, भाजपाचे महापालिकेला निवेदन

भाजपाचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना निवदेन देऊन स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मैदाने…

political rivalry Ajit Pawar and BJP’s Mahesh Landge Pimpri
पिंपरीत अजित पवार- भाजपचे महेश लांडगे यांच्यातील राजकीय वैर शिगेला? फ्रीमियम स्टोरी

शहराचा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच विकास झाल्याचा दावाही लांडगे करत असतात. त्यावरून पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर लांडगे यांना सुनावले होते.

Himanta Sarma Vs Gaurav Gogoi Over Congress MPs Wife Alleged Pakistan
काँग्रेस खासदाराच्या पत्नीला पाकिस्तानी ‘एनजीओ’कडून पगार? भाजपा नेत्याचा आरोप, नेमका वाद काय?

Himanta Sarma Vs Gaurav Gogoi आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात तणाव पाहायला…

संबंधित बातम्या