भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
BJP lone Muslim MP on Waqf Act
BJP lone Muslim MP on Waqf Act : भाजपाच्या एकमेव मुस्लिम खासदाराला वक्फ कायद्याबद्दल काय वाटतं? मांडली महत्त्वाची भूमिका

वक्फ कायद्याबद्दल भाजपाचे एकमेव मुस्लिम खासदार गुलाम अली यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

नितीश कुमार यांना उपपंतप्रधान करण्याची का होतेय चर्चा? यामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Deputy PM of India : नितीश कुमार उपपंतप्रधान होणार? राजकीय वर्तुळात का होतेय चर्चा?

Nitish Kumar Deputy PM : एकीकडे बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने नितीश कुमार यांना थेट उपपंतप्रधान…

jayant patil slams bjp mla amit gorkhe news in marathi
पिंपरी: “माझी भूमिका बदलली नाही, जयंत पाटलांनी प्रसिद्धीसाठी काहीही बोलू नये”- भाजप आमदार अमित गोरखे

याच प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आमदार अमित गोरखे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप केला आहे.

भाजपाच्या 'त्या' निर्णयामुळे मित्रपक्ष अडचणीत? सत्ताधाऱ्यांची पुढची रणनीती काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP Strategy : मित्रपक्षांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजपाची रणनीती काय?

BJP on Waqf Act 2025 : सुधारित वक्फ कायद्यावरून सत्ताधारी एनडीएमधील मित्रपक्ष अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. हीच बाब लक्षात…

Member Registration state tenure of Devendra Fadnavis era bjp president chandrashekhar bawankule
सदस्य नोंदणी :फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना अन् बावनकुळेंच्या काळातील ….

महाराष्ट्रात यंदा १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणी झाली. फडणवीस प्रदेशाध्यक्ष (२०१३-२०१५)असताना ती ७७ लाख झाली होती. याकडे बावनकुळे यांनी…

Remembering Ram Manohar Lohia on His Birth Anniversary
लोहिया आज असते तर त्यांनी भाजपविरोधाचा नारा दिला असता… प्रीमियम स्टोरी

लोहियांचा राजकीय वारसा त्यांच्या अनियमित राजकारणाच्या विखुरलेल्या आठवणींमध्ये झाकोळला गेला आहे.

काँग्रेसचं 'या' राज्यातील सरकार अडचणीत? भाजपाला सापडली सत्तेची चावी? कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
काँग्रेसचं ‘या’ राज्यातील सरकार अडचणीत? भाजपाला सापडली सत्तेची चावी? कारण काय?

Congress vs BJP Political News : भ्रष्टाचाराच्या बाबतीत कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे, असं विधान सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे आमदार बसवराज रायरेड्डी…

वसुंधरा राजे यांच्यामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेसने मानले आभार, राजस्थानमध्ये चाललंय काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : वसुंधरा राजे यांच्यामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेसने मानले आभार, राजस्थानमध्ये चाललंय काय?

BJP vs Congress in Rajasthan : पंतप्रधानांनी जल जीवन मिशनसाठी ४२ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. तुम्हाला प्रत्येक पैशाचा…

देशावर आर्थिक संकट येतंय, पंतप्रधान मोदी कुठं लपून बसलेत? राहुल गांधी काय म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Modi vs Gandhi : देशावर आर्थिक संकट येतंय, कुठं गेली ५६ इंचाची छाती? राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

Rahul Gandhi on PM Modi : देशावर आर्थिक संकट येतंय, पंतप्रधान मोदी कुठे लपून बसलेत? कुठं गेली ती ५६ इंचाची…

Amit Shah childhood Name
‘मला लहानपणी पूनम म्हणायचे’, अमित शाह यांनी सांगितला टोपणनावामागचा किस्सा

Amit Shah childhood Name: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या लहानपणी त्यांना पूनम या नावाने हाक मारली जात असल्याचा किस्सा…

बिहारमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? अमित शाह काय म्हणाले? (फोटो सौजन्य पीटीआय)
Amit Shah : नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? अमित शाह काय म्हणाले?

Bihar Elections 2025 : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यश मिळाल्यास नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील का? असा…

संबंधित बातम्या