भारतीय जनता पार्टी

भारतीय जनता पक्ष (BJP) हा देशातील प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष आहे. देशात २०१४, २०१९ आणि २०२४ साली या पक्षाला सत्तास्थापनेची संधी मिळाली. मात्र गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या (२०१४, २०१९) तुलनेत भाजपाला २०२४ साली स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला केवळ २९३ जागांवरच समाधान मानावे लागले. यात भाजपाचा वाटा २४० इतका आहे. २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकत स्वबळावर बहुमताचा आकडा भाजपाने पार केला होता. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले होते. परिणामी भाजपाला अनेक जागांवर पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, राजस्थान या ठिकाणी भाजपाला फटका बसला.


संविधानात बदल घडवण्याची चर्चा, कांद्याला भाव, महागाई, बेरोजगारी, पिकाला हमीभाव आदी प्रश्नांवर विरोधकांनी भाजपाला कोंडीत टाकले होते. या कारणांमुळे भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपाला सहयोगी पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे.


पक्षाची स्थपाना आणि इतिहास (Formation and History of the BJP)

१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस (Congress) व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व या दरम्यान आंदोलन करताना अटक झालेल्या मुखर्जी यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला. १९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली.


१९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले. जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. नरेंद्र मोदी (Narendra Modi), राजनाथ सिंह, वेंकय्या नायडू, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जे.पी. नड्डा असे अनेक नेते भाजपाचे प्रमुख चेहरे बनले. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, किरीट सोमैय्या, चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे प्रमुख चेहरे आहेत.


Read More
AAP finishes second behind BJP in Gujarat local body Elections
local body Elections : दिल्लीतील पराभवानंतर ‘आप’ला गुजरातमध्ये दिलासा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिंकल्या इतक्या जागा; काँग्रेसची पीछेहाट सुरूच

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत.

Shivraj Chouhan Slams Air India management
Shivraj Chouhan : केंद्रीय मंत्र्याचा Air Indiaच्या विमानातील तुटलेल्या सीटवर बसून प्रवास; पोस्ट लिहित म्हणाले, “माझी समजूत होती की टाटा व्यवस्थापनाने…” फ्रीमियम स्टोरी

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

Suresh Dhas
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे मोकाट कसा? पोलिसांनी…”

सुरेश धस यांनी आपण मस्साजोगकरांच्या मागण्यांचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचं म्हटलं आहे.

BJPs Adv dharmapal meshram claimed viral video of deported indians is false
“तो व्हिडिओ खरा असल्यास मी अमेरिकेचा निषेध नोंदवितो,” भाजप प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे वक्तव्य

भाजपचे प्रवक्ते तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला. हा व्हिडीओ…

Jalna Ssc Paper Leak Controversy Update Collector Clarify Case Shri Krishna Panchal
Jalna SSC Paper Leak Update: “तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही”; जिल्हाधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट

जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला अशी बातमी समोर आले होती. मात्र प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला…

Raj Thackeray met the Municipal Commissioner
Raj Thackeray: राज ठाकरेंनी घेतली मनपा आयुक्तांची भेट; भेटीदरम्यान काय चर्चा झाली?

Raj Thackeray: आज राज ठाकरेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. “या वास्तूमध्ये किती वर्षांनी…

bjp mla shweta mahale get death threat
आधी एकनाथ शिंदेंना, आता भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी; सत्ताधाऱ्यांना…

या घटनेने त्यांचे समर्थक प्रक्षुब्ध झाले असून चाहत्यांतून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. अशा कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई…

USAID India chief Veena Reddy
USAID च्या वीना रेड्डी कोण आहेत? भाजपाने २१ मिलियन डॉलर्सच्या मतदान निधीवरून का उपस्थित केला त्यांच्या भूमिकेवर प्रश्न?

Former USAID India chief Veena Reddy २१ मिलियन डॉलर्सच्या मतदान निधीवरून यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसआयडी) च्या माजी भारतीय…

Police take into custody those who threatened to kill Deputy Chief Minister Eknath Shinde
Eknath Shinde:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मंगेश वायाळ आणि…

Prakash Ambedkar gave a one-sentence reply to the statement that no action was taken against Rahul Solapurkar
राहुल सोलापूरकरांवर कारवाई नाही, प्रकाश आंबेडकरांनी दिलं एका वाक्यात उत्तर | Prakash Ambedkar

राहुल सोलापूरकरांवर कारवाई नाही, प्रकाश आंबेडकरांनी दिलं एका वाक्यात उत्तर | Prakash Ambedkar

संबंधित बातम्या