सीपीआय News

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय (एम)) हा एक राजकीय पक्ष आहे. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्यानंतर या पक्षाची स्थापना झाली होती. पश्चिम बंगालमध्ये या पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने ३४ वर्षे सत्ता गाजवली होती. ही जगात सर्वाधिक काळ चालणारी लोकशाही पद्धतीने निवडून आलेली कम्युनिस्ट नेतृत्त्वातील सरकार होती. सध्या सीपीआय (एम) ही दोन राज्यांमधील सत्तारुढ युतींचा भाग आहे. केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि तमिळनाडूमध्ये सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स.


सीताराम येचुरी हे सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस आहेत. सध्या लोकसभेमध्ये या पक्षाचे केवळ ४ सदस्य आहेत. तर राज्यसभेमध्ये ५ सदस्य आहेत. देशातील विविध विधानसभांमध्ये या पक्षाचे ७८ सदस्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या केवळ ९ उमेदवारांना विजय मिळाला होता तर या पक्षाला समर्थन देणारे दोन अपक्ष निवडून आले होते. या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाचा देशस्तरावरील मतांचा वाटा देखील घसरला होता. २००९ मध्ये तो ५.३३ टक्के होता जो २०१४ मध्ये ३.२४ टक्के इतका कमी झाला.


२०१९ च्या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाने देशपातळीवर ६९ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना केवळ ३ जागाच जिंकता आल्या. यातील एक जागा केरळमध्ये तर दोन जागा तमिळनाडूमध्ये जिंकल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही सीपीआय (एम) पक्षाला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. पक्षाने देशपातळीवर ५२ जागा लढवल्या, मात्र केवळ चारच जागांवर विजय मिळाला. यात एक जागा केरळ, एक राजस्थान आणि दोन तमिळनाडू येथील आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्येदेखील सीपीआय (एम) पक्षाला संसदेत आपली संख्या वाढवण्यात अपयश आल्याचे दिसून येते. २००९ पासून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्याचबरोबर २०१४ (३.२४ %), २०१९ (१.७५ %) आणि २०२४ (१.७६ %) च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा मतांचा टक्का घसरला आहे.


Read More
cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!

सीताराम येचुरी यांच्या निधनामुळे सीपीआयएला पक्षाचे अंतर्गत कामकाम सुरू ठेवण्यासाठी एका अनुभवी नेत्याची गरज आहे.

Communist Party of India Marxist mva
आघाडीच्या जागा वाटपात डावे पक्ष, संघटना दुर्लक्षित ? डावे पक्ष, संघटनांनी दिला महाविकास आघाडीला गंभीर इशारा

पक्षाची भूमिका मांडताना डॉ. अजित नवले म्हणाले, माकप व जनसंघटनांचे चांगले काम असलेल्या, प्रदीर्घ आणि यशस्वी लढे दिलेल्या ठिकाणच्या जागांची…

girish kuber sitaram Yechury marathi news
अन्यथा: एकेक फोन गळावया…

येचुरी तेव्हापासून ‘जवळच्या’ राजकीय नेत्यांत अगदी वरच्या रांगेत जाऊन बसले. मेसेजिंग, फोनवर बोलणं, काही विषयासंबंधात संदर्भासाठी त्यांना त्रास देणं वगैरे…

Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
अग्रलेख : उजवा डावा!

Sitaram Yechury : अटलबिहारी वाजपेयी यांचे कडवे टीकाकार हे परिवारातीलच होते आणि येचुरी यांचे खरे विरोधकही कॉम्रेड म्हणवणारेच होते…

Who was CPI(M) General Secretary Sitaram Yechury in marathi
Sitaram Yechury: सीताराम येचुरी कोण होते? डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाजपा-संघाचे कडवे टीकाकार काळाच्या पडद्याआड

Who was Sitaram Yechury: प्रख्यात मार्क्सवादी नेते, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि सीपीआय-एम पक्षाचे लागोपाठ तीन वेळा सरचिटणीस हे सर्वोच्च पद…

Buddhadeb Bhattacharya passes away
Buddhadeb Bhattacharya Death: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे ८० व्या वर्षी निधन; ज्येष्ठ कम्युनिस्ट नेता हरपला

Buddhadeb Bhattacharya passes away : पश्चिम बंगालचे शेवटचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री राहिलेले बुद्धदेव भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होते.

Who is 33 year old Pratikur Rahman
 ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. या जागेवरून ममता यांनी पुन्हा एकदा…

maharashtra, Communist Party of India Marxist, lok sabha election 2024, constituency
मार्क्सवाद्यांमध्ये मतदारसंघाच्या निवडीवरून धुसफूस

सोलापूर, पालघर आणि दिंडोरी अशा तीन मतदारसंघाची ‘माकप’ने आघडीकडे मागणी केली होती. मात्र, आघाडीने घटक पक्षांना एकही जागा सोडलेली नाही.

nagpur, communist party of india, bhalchandra kango, Criticizes PM Modi, Adani, Ambani, National Secretary, bjp, india alliance,
पंतप्रधान मोदी अदानी – अंबानींच्या सेवेत! भाकपचे भालचंद्र कांगो म्हणाले, देशाचे नेतृत्व चुकीच्या दिशेने…

नोटबंदीत नोटा बदलण्यासाठी रांगेत उभे राहून देशात १५३ लोकांचा मृत्यू झाला परंतु त्यांच्याबद्दल एक शब्दही पंतप्रधानांनी काढला नाही. असे भालचंद्र…