डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR Babasaheb Ambedkar) यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशमधील महू येथे झाला. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होत. त्यांनी स्त्री-पुरष समानतेचा पुरस्कार केलेला आहे. अस्पृश्यता, जातीवाद समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मूकनायक, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, जनता, समता या नियतकालिकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक समतेचा लढा लढला. बहिष्कृत हितकारिणी, स्वतंत्र मजूर पक्ष अशा संघटना उभारून त्यांनी समतेचा लढ्याला अधिष्ठान प्राप्त करून दिले. आंबेडकरांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग आदी क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.Read More
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अज्ञात माथेफिरूने चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली येथील बस थांब्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याने समजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात…
डॉ. आंबेडकरांना संघप्रणीत हिंदुत्वाबद्दल कधीच आपलेपणा वाटलेला नाही, हे सत्य पुसून टाकण्याच्या प्रयत्नात ‘केसरी’ वृत्तपत्रातील कथित बातमीचा आधार आता घेतला…