भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.
भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
India on USAID funds: भारतातील निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी अमेरिकेकडून २.१ कोटी डॉलर्सचा निधी दिला गेला, याची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने…
देशाला ज्ञानेश कुमार यांच्या रूपात नवे मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले आहेत. दरम्यान याच निमित्ताने आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला मिळालेल्या निवडणूक आयुक्तांबद्दल…
इच्छामरणावर नवीन मसुदा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये गंभीर आजाराची व्याख्या केली आहे. यामध्ये एक अपरिवर्तनीय किंवा असाध्य स्थिती म्हणून गंभीर आजाराची व्याख्या…