Associate Sponsors
SBI

महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Union Budget 2025
Union Budget 2025 : “हे बजेट भारताचे नाही तर…”, निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला आहे.

maharshtra sadan
महाराष्ट्र सदनातील त्रुटी दूर होणे आवश्यक, मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा; स्वत: लक्ष घालण्याचे आश्वासन

दिल्लीतील प्रतिष्ठित नवीन महाराष्ट्र सदनातील सोयीसुविधांचा खालावलेला दर्जा, प्रशासनाचा ढिसाळ कारभार तसेच, इतर समस्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल…

upper tehsil office at ashvi in sangamner taluka
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय

आश्वी येथील या कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांची यादी कळीचा मुद्दा ठरला असून त्यावरून राजकारण तापणार आहे.

Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडी वर दिलेले सौर पंप दोन दिवसातच बंद पडल्याने ते दुरुस्तीसाठी कंपनीचे प्रतिनिधी आले नाहीत यामुळे मागील…

Washim district, Maharashtra , Operation Dronagiri,
‘ऑपरेशन द्रोणागिरी’ पथदर्शी प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून एकमेव वाशीम जिल्ह्याची निवड; जाणून घ्या वैशिष्ट्ये

देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये वाशीमची निवड ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच

शालेय पोषण योजना देशपातळीवार राबवल्या जाते. अनेक त्रुटी दूर करीत योजना चालू आहे. त्यात तक्रारी असतात आणि पोषण मूल्य जपण्याची…

Loksatta anvyarth Why is Maharashtra which is leading the country in various economic and social sectors declining
अन्वयार्थ: महाराष्ट्र का थांबला?

पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार परिषद, वाणिज्य मंत्रालयाची व्यवसायसुलभता राज्यांची यादी, रिझर्व्ह बँकेचा राज्यांचा वित्तीय व्यवस्थापन अहवाल, निती आयोगाचे निर्यात निर्देशांक किंवा निती…

patients , GBS , maharashtra, ventilator,
राज्यात एकाच दिवसात जीबीएसचे ९ रुग्ण! एकूण रुग्णसंख्या ११० वर; व्हेंटिलेटरवर १३ जण

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) एकाच दिवसात ९ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ११० वर पोहोचली आहे. सध्या १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर…

Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके?  फ्रीमियम स्टोरी

पिकांसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. त्यातूनदेखील जलप्रदूषण होते. जर पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण अधिक असेल, तर त्याचा…

union agriculture minister shivraj singh chauhan on soybean rate
सोयाबीनला कमी दर मिळाला; केंद्रीय कृषिमंत्र्यांची कबुली, जाणून घ्या, पुढील आश्वासन काय फ्रीमियम स्टोरी

हमीभावापेक्षा ४०० रुपये कमी मिळाले केंद्र सरकारने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला होता.

संबंधित बातम्या