सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.
सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.
महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
मुंबईला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली होती.
कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात स्थलांतरित होण्यास दोन्ही इमारतींमधील रहिवाशांनी नकार दिला आहे. प्रभादेवी परिसरातच संक्रमण शिबिरे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी…
मुंबईतील मॉल आगीच्या दुर्घटनांच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे. यापूर्वीही मुंबईत भांडूप, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथील मॉलमध्ये…