ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
गेल्या १२ वर्षांच्या कठोर परिश्रमांतून पेरलेले हिंदू-मुस्लीम द्वेषाचे बीज चांगलेच तरारून आले आहे. त्याला थोडे खतपाणी घातले तर पाकिस्तानचा (ना)पाक हेतू सफल होईल…
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली जाते, हे मोदींचे कणखर नेतृत्व मान्य करणाऱ्यांना धक्का देणारे आहे.
PM Modi Mann Ki Baat: “देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प मजबूत करावा लागेल. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवावी लागेल”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
Pahalgam Terror Attack : सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अशा बैठकीला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे महत्त्वाचे असते.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करणारे लोक त्यांचं नियोजन रद्द करीत आहेत. केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाचा जोर वाढत असताना असा भयानक नरसंहार झाला आहे. त्याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसत आहे.
Kashmir Terrorist Attack : संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की नोटबंदीनंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपेल. मात्र त्याच्या उलट घडतंय.