scorecardresearch

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
tractor market boost Kolhapur
चांगल्या पावसामुळे ट्रॅक्टर बाजारपेठेत सुगी, देशभरात २० टक्क्यांनी मागणीत वाढ

शेती हंगामपूर्व मे महिन्यांत देशभरात ट्रॅक्टरच्या मागणीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

rains stop across maharashtra including in mumbai heat and showers expected early august
राज्यात पावसाची दडी… पुढील काही दिवस ऊन – पावसाचा खेळ

मुंबईसह राज्यातील बहुतांशी भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात ऊन- पावसाचा लंपडाव चालणार आहे.

Thane's water supply reduced by 20 percent
ठाण्याच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात…अनेक भागात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन ६१६ दशलक्ष लीटर इतका पाण्याचा कोटा मंजुर आहे. प्रत्यक्षात शहराला…

cht Sambhajiraje Theatre Program
जळगावमधील बाका प्रसंग.. नाट्यगृहात कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांसह नागरिक घामाघूम

जळगाव शहरात प्रशस्त नाट्यगृह अस्तित्वात नसताना जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहाचा अनेक वर्षे नाट्यगृह म्हणून वापर केला गेला. कालांतराने देखभाल व…

Kolhapur rain updates
Kolhapur Rain Updates : कोल्हापुरातील धरण, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ; पूरस्थितीने सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी पावसाची उघडीप सुरू होती. सुटी लोकांना घरातच घालवावी लागली.

house collapse due to heavy rain in Savli Wagh child and mother live in toilet
दारिद्र्याचे दशावतार; पावसात घर कोसळले, आई – मुलगा शौचालयात, प्रशासन उदासीन

हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथे घर कोसळल्याने वृद्ध आईसोबत मुलाला घरातील स्नानगृह व शौचालयात राहण्याची वेळ आली आहे

संबंधित बातम्या