Associate Sponsors
SBI

पाऊस

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला पावसासंबंधित सर्व माहिती मिळेल. पाऊस (Rain)ही हवामानाशी संबंधित घटना आहे. वातावरणात असलेल्या ढगांमधील वाफेचे जेव्हा द्रवरूपात रूपांतर होते तेव्हा पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागलाल. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने पाऊस पडतो. सोप्या भाषेत सांगायचे, तर जेव्हा ढगांमधून पाण्याचे थेंब कोसळतात त्याला पाऊस म्हणतात. पाऊस ही मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण- जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जलप्राप्ती होते.


पावसाच्या पाण्यामुळे नदी, नाले आणि ओढे ओसंडून वाहू लागतात. सर्व पृथ्वी हिरवीगार होते. भारत हा प्रामुख्याने कृषिप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी भारतात पावसाचे विशेष महत्त्व आहे. देशात काही ठिकाणी एकदाच पावसाळा असतो; तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैर्ऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो; ज्याला मान्सून, असे म्हटले जाते. त्यामुळे भारताचा विचार करता, अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. पावसासंबंधीचा अंदाज हवामान खाते वर्तवीत असते.


पाऊस कधी येऊ शकतो, किती प्रमाणात पाऊस होईल यासंबंधीची सर्व माहिती हवामान खाते वेळोवेळी सांगत असते. या माहितीवर आधारित सविस्तर बातम्या तुम्ही येथे वाचू शकता. तसेच पावसाळ्यात देशभरातील विविध राज्यांची आणि शहरांमध्ये काय स्थिती आहे हेदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. पावसाळा आला की, आरोग्यासंबंधीची काय काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, वाहनांची काळजी कशी घ्यावी अशी अनेक विषयांवरील माहिती तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तसेच पावसाळ्यात भेट देण्यासारखी स्थळे कोणती आतहे, पावसाळ्यात पर्यटन करताना काय काळजी घ्यावी अशी माहितीदेखील तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.


Read More
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडून थंड वाऱ्याचा झोत अरबी समुद्रावरून गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दिशेने वाटचाल करण्याची…

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम

थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे.

Rain in North Konkan Meteorological Department has predicted Mumbai news
उत्तर कोकणात आठवडा अखेरीस पाऊस? जाणून घ्या, हवामान विभागाचा अंदाज काय

पश्चिमेकडून येणारे थंड वारे अरबी समुद्रावरून उत्तर कोकणात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी उत्तर कोकणात हलका पाऊस पडण्याची…

North Maharashtra due to unseasonal rain on Friday damaged crops
उत्तर महाराष्ट्रात १३०० हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान

नाशिक जळगाव उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

Rain in Mumbai in winter Mumbai print news
ऐन थंडीत मुंबईत पावसाचा शिडकावा

गेले दोन तीन दिवस मुंबईतील तापमानात बऱ्यापैकी घट झाली असल्याने पहाटे तसेच रात्री गारवा जाणवत आहे. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री शहर…

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…

ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. अकोला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून रिमझिम पाऊस पडला.

amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?

वादळी पावसामुळे झाडांचे नुकसान किंवा मोठी झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे यासाठी व वाहतुकीचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी अग्निशमन विभागाचे…

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम

मंगळवेढ्याच्या मालदांडी ज्वारीची खमंग, खरपूस अशी भाकरी घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळते. देशभर मागणी असलेल्या या ज्वारीला यापूर्वीच जीआय मानांकन मिळाले…

Cloudy weather persisted with unseasonal rains in Shirala Ashta and Islampur areas
सांगलीत पावसाची हजेरी; द्राक्ष बागायतदारांना चिंता

जिल्ह्यात ढगाळ हवामान सलग कायम असून शुक्रवारी सायंकाळी शिराळा तालुक्यात, तर शनिवारी पहाटे आष्टा, इस्लामपूर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Kolhapur district hit by heavy unseasonal rain during night
अवकाळीचा फटका, कोल्हापुरात उस जमीनदोस्त

कोल्हापूर जिल्ह्याला रात्री पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना बसला आहे.

संबंधित बातम्या