रत्नागिरी (Ratnagiri) अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचे नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक; समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे; गणिततज्ञ रॅंग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे या सर्वांचा जन्म रत्नागिरी मध्ये झाला होता. तसेच भारतरत्न विनोबा भावे, भारतरत्त्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्त्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न सचिन तेंडूलकर, भारतरlत्न गोविंद वल्लभ पंत हे सर्व मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहे.Read More
रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर दरवर्षी घसरत असल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्म दरात होणारी घसरण पाहता…
वडदहसोळ येथील ग्रामस्थ गिरीष म्हादये यांच्या घराच्या अंगणामध्ये गेले दोन दिवस बिबट्या रात्रीच्यावेळी आल्याचे त्यांच्या घर परिसरामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही…