शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Shiv Sena BJP political conflict over Kumbh Mela
कुंभमेळ्याच्या पहिल्याच कामात शिवसेना-भाजपमध्ये सुप्त संघर्ष

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात महायुतीतील वादामुळे अडीच महिने उलटूनही पालकमंत्र्याची नेमणूक झालेली नाही.

पालकमंत्रिपदावरून महायुतीत उठाव होणार? अमित शाहांच्या दौऱ्याआधी काय घडतंय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : पालकमंत्रीपदावरून शिंदे गटाचा उठाव? अमित शाहांच्या दौऱ्याआधी नेमकं काय घडतंय?

Raigad Guardian Minister : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (तारीख १२ एप्रिल) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाची…

Mahendra Dalvi On Raigad Guardian Minister
Mahendra Dalvi : पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी? ‘…तर मोठा उठाव होईल’, शिंदेंच्या आमदाराचा तटकरेंना इशारा

शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा इशारा दिला आहे.

Maharashtra Breaking News Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्प, बुलेट ट्रेन आणि रेल्वे स्टेशन विकासासाठी १ लाख ७३ हजार कोटी रुपये मंजूर

Mumbai Pune Breaking News Today, 11 April 2025 : आज महत्मा फुले यांची १९८ वी जयंती आहे. त्या निमित्ताने आज…

Eknath Shinde made a big statement on shahaji Bapu in sangola
Eknath Shinde: “टायगर अभी जिंदा है”; भर सभेत शहाजी बापूंना काय म्हणाले शिंदे?

Eknath Shinde: आज (१० एप्रिल) सांगोला येथील एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी…

Sudhakar ghare loksatta
शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करणारे सुधाकर घारे राष्ट्रवादीत पुन्हा सक्रीय

विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात वाद झाला होता.

Shiv Sena leader Sanjay Nirupam talk about Comedian Kunal Kamra and UBT Shiv Sena
कुणाल कामराला पैसे मातोश्रीवरून गेलेत, कॉमेडियनच्या मदतीने ठाकरे राजकारण करतायत – निरुपम

कॉमेडियन कुणाल कामराच्या वादावर, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने कुणाल कामराला पैसे देऊन हे विडंबनपर…

Sanjay Nirupam On Kunal Kamra
Sanjay Nirupam : ‘एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं करण्यासाठी ठाकरे गटाने कामराला पैसे दिले’, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

संजय निरुपम यांनी कुणाल कामरा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Pratap Sarnaiks Palghar visit sees shiv Sena banners highlighting internal party conflicts over the issue
प्रताप सरनाईक यांच्या स्वागताला जिल्ह्यात तुफान बॅनरबाजी, शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्या वर

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी शिवसेने च्य स्थानिक नेत्याने तुफान बॅनर बाजी केली…

ganesh naiks janata darbar in thane while pratap Sarnaik Shiv Sena Lok Darbar in Palghar
गणेश नाईकांचा पुन्हा शिंदेच्या ठाण्यात ‘जनता दरबार’ तर नाईकांच्या पालघरमध्ये सरनाईकांचा ‘ शिवसेनेचा लोकदरबार’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात पुन्हा एकदा वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार…

Abu Azmi On Sanjay Shirsat Statement Khuldabad Rename :
Abu Azmi : “…तर संपूर्ण देशाचं नाव बदला”, खुलताबादच्या नामांतराच्या चर्चांवरून अबू आझमींची सरकारवर टीका

खुलताबाद शहराचं नामांतर करण्याच्या संदर्भात संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर आता आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या