कोकण विभागातील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग(Sindhudurg). या जिल्ह्याची स्थापना १ मे, इ.स. १९८१ साली झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पूर्वी दक्षिण रत्नागिरी असे होते, येथील सुप्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन ते बदलून सिंधुदुर्ग असे ठेवण्यात आले.
१९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. गोवा राज्याची सीमा या राज्याच्या सीमांना संलग्न आहेत. रामायण, महाभारतापासून ते यादव, चालुक्य साम्राज्यांपर्यंत सिंधुदुर्गच्या भूमीचा उल्लेख आढळतो. येथे कोंकणी, मालवणी अशा स्थानिक भाषांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या जिल्ह्यामध्ये जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट या तिन्ही प्रकारचे किल्ले आहेत. पर्यटन, मासेमारी यांच्याव्यतिरिक्त आंबा, काजू यांची निर्यात करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत.Read More
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ झाल्यावर रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा असलेल्या बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान सेवा देण्यासाठी तारतम्य बाळगले…
Sindhudurg DPDC: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबीयांचे पूर्णपणे वर्चस्व दिसत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात वनआच्छादनात मोठ्याप्रमाणात घट होत असतना मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ.मीटरने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे.
सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांच्या अधिवासाबरोबरच त्यासाठीची पोषक परिस्थिती असल्याने या ठिकाणी समुद्री घोड्यांसाठी संवर्धन, प्रजनन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.