आत्महत्या

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नीरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे (Subside) विचार येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणारं अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते. काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.


ब्रिटीश काळातील भारतीय दंड संहिता १८६० मध्ये असलेल्या कलम ३०९ नुसार आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार, “जो कुणी आत्महत्येचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील” हे कलम जुनाट असून त्यावर अनेकदा टीका झाली. १९७१ मध्ये हे कलम रद्द करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले. पुढे अनेकदा त्यावर चर्चा झाल्या. २००८ मध्ये विधी आयोगाच्या २१० व्या अहवालामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आणि मनोरुग्ण उपचारांची गरज आहे, शिक्षेची नाही. असे नमूद करण्यात आले. पुढे २०१७ मध्ये याविशयी विधेयक आणून २०१८ मध्ये ते अमलात आले.


मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (१) मध्ये म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ व्याख्येनुसार काहीही असले तरी आत्महत्येचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती, गंभीर ताणतणावात असल्याचे गृहित धरले जाईल आणि या संहितेमनुसार सदर व्यक्तीविरोधात खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (२) नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये किंवा तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सरकारने अशा व्यक्तीची काळजी घेणे, त्याला उपचार देणे आणि त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सरकारचे हे कर्तव्य आहे.


या व्यतिरिक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो. कलम १०६ नुसार, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस जर कुणी प्रवृत्त केले असेल तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच द्रवदंडांची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.” तर कलम १०५ नुसार “१८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, मानसिक आजार असलेली कोणतीही व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती किंवा नशेच्या अमलाखाली असलेली व्यक्ती आत्महत्या करेल आणि अशा व्यक्तीच्या आत्महत्येसाठी जर कुणी जबाबदार असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते.”


प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, दु:ख, वेदना असतात. प्रत्येकजण संकटांचा सामना करत असतो. तेव्हा अपयशाने खचून न जाता सतत संघर्ष करणे आवश्यक असते. आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करु शकता. शासनही त्यामध्ये मदत करते. सरकारच्या अनेक हेल्पलाइन्स मानसिकदृष्टा खचलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात.


Read More
yavatmal professor committed suicide
यवतमाळच्या प्राध्यापकाची धामणगावात आत्महत्या, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

प्रा. संतोष गोरे हे येथील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

nanded love crime
नांदेडजवळ प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीकडच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

नांदेड शहरालगत असलेल्या सुगाव येथे नितीन प्रभू शिंदे या १९ वर्षीय तरुणाने प्रेमप्रकरण आणि त्यामुळे मुलीच्या नातेवाईकांकडून झालेल्या अपमानामुळे २०…

sushant singh Rajput death
मोठी बातमी: सुशांतसिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्याच, पाच वर्षांच्या तपासानंतर सीबीआयचा अंतिम अहवाल

सुशासिंग राजपुत याने आत्महत्याच केल्याचे समोर आले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते व तत्कालीन गृहमंत्री अनिल…

Married Man Ends Life after girlfriend left him
अजब प्रेम गजब अंत! प्रेयसीच्या विरहाने विवाहित प्रेमीची आत्महत्या!! इंस्टाग्राम वर केले ‘शेअर’…

या अजब प्रेमाच्या अंताची सिंदखेड राजा तालुकाच नव्हे जिल्ह्यात उलट सुलट चर्चा होत आहे…

dr payal tadvi
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी करण्याविरोधात डॉ. चिंग लिंग चुंग चियांग यांची उच्च न्यायालयात धाव

दरम्यान, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप…

Jammu Kashmir: भाजपाच्या माजी आमदाराची आत्महत्या, सरकारी निवासस्थानातच संपवले आयुष्य

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर निवडणुकीत भाजपाचे फकीर मोहम्मद खान हे गुरेझ या मतदारसंघातून उभे राहिले होते. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह…

elderly man attempts suicide at collector s office in solapur
सोलापुरात वृद्धाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न ; मुले सांभाळत नसल्याने नैराश्य

सोपान राऊत नावाच्या एका शेतकऱ्याची ही व्यथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कानावर गेली असून, त्यांनी त्याची गंभीर दखल घेत राऊत…

atal setu Mumbai loksatta news
मुंबई : आता ‘या’ रस्त्यावरही आत्महत्या, मोटरगाडी उभी करून समुद्रात उडी मारली

तरूणाने समुद्रात उडी मारण्यापूर्वी कोणती चिठ्ठी लिहिलेली अद्याप सापडलेली नाही. त्याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kailash Nagare, Buldhana farmer, suicide ,
लोकजागर : शेतकऱ्यांच्या कबरींचे काय?

बुलढाण्याचे पुरस्कारप्राप्त शेतकरी कैलास नागरेंनी केलेली आत्महत्या शेतीच्या प्रश्नांवर कायम थापा मारणाऱ्या राज्यकर्त्यांच्या गालावर चपराक लगावणारी आहे.

first farmer suicide in maharashtra Food boycott movement Yavatmal
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना, यवतमाळमध्ये अन्नत्याग आंदोलन

बुधवारी महागाव तालुक्यातील चिलगव्हाणसह गुंज, पुसद, यवतमाळ आदी ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

49000 farmer suicides recorded in the Maharashtra state in 24 years Amravati
‘शेतकरी सहवेदना दिवस’ म्हणजे काय?, सहकुटुंब पहिली शेतकरी आत्महत्या केव्हा?

राज्यात गेल्या २४ वर्षांत तब्बल ४९ हजार शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. महाराष्ट्रात दिवसाला सहा…

संबंधित बातम्या