करोना संकट आणि शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. विकासाला गती देण्यासाठी सरकार आपली तिजोरी अधिक खुली करत असल्याचे या अर्थसंकल्पामधून दिसून येत आहे. आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांमध्ये मोठी भांडवली गुंतवणूक करत रोजगार वाढवणे व त्याद्वारे लोकांच्या हातात पैसा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. या अर्थसंकल्पासंदर्भात अनेकांनी मतप्रदर्शन केलं आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी हा अर्थसंकल्प उत्तम असल्याचे म्हटले आहे तर विरोधकांनी मात्र यावर टीका केली असं असतानाच उद्योजकांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अदानी उद्योग समुहाचे गौतम अदानी यांनाही ट्विटरवरुन मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे तोंड भरुन कौतुक केलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा