रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत आशादायी संकेत देताना, अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पाच टक्के पातळीपासून उंचावताना लवकरच दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
नजीकच्या काळात अर्थवृद्धीला चालना मिळताना दिसेल आणि पाच टक्क्यांखाली स्थिरावलेला विकास दर त्या पल्याड उंचावलेला दिसून येईल, अशी आशा राजन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानानंतर ‘पीटीआय’कडे बोलताना व्यक्त केली.
यापूर्वी म्हटल्याप्रमाणे विकासाला चालना आणि महागाई दरावर नियंत्रण या दोन्ही बाबी परस्परविरोधी नसल्याचा निर्वाळा देताना ते म्हणाले, भारताच्या विकासपथात महागाई हा अडथळा आहे, असे आपण म्हटले आहे. राजन यांनी येथे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वार्तालापात कोणत्याही राजकीय मुद्दय़ावर वक्तव्य करण्याचे त्यांनी टाळले. १६ मे रोजी निवडणुकांचे निकाल येणारच असून, त्यायोगे सर्व काही स्पष्टच होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. तथापि कोणतेही सरकार आले तरी अर्थवृद्धीच्या उभारीसाठी ते सुस्पष्ट धोरण आखेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा