भारतातील सोन्याची आयात गेल्या काही महिन्यांत वाढली आहे, लग्न आणि सण-संबंधित मागण्यांमुळे तसेच धातूवर साठा करणारे लोक, भविष्यातील त्रास आणि किंमती वाढण्याची अपेक्षा करतात.तुलनेने लोकांचा सोने खरेदी करण्याचा कल अशा वेळी येतो जेव्हा गरीब भारतीय कुटुंबे निधीसाठी तुटपुंजे सोने गहाण ठेवतात आणि परतफेड अयशस्वी झाल्यामुळे त्यांच्या होल्डिंगचा लिलाव झालेला दिसतो. विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे कोविड महामारी दरम्यान भारताच्या असमान आर्थिक रिकव्हरीचे प्रतिबिंब आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाणिज्य मंत्रालयाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, सोन्याची आयात ऑगस्टमध्ये ८२ टक्क्यांनी वाढून ६.७ अब्ज डॉलर आणि जुलैमध्ये १३५ टक्क्यांनी वाढून ४.२ अब्ज डॉलरवर पोहोचली. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारताने सुमारे $१९ अब्ज डॉलर्स सोन्याचे दागिने आयात केले आहेत, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीत सुमारे सुमारे $६ अब्ज डॉलर्सच्या आयातीपेक्षा २०० टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या काही महिन्यांत, एकूण आयातीत सोन्याच्या आयातीचा वाटाही झपाट्याने वाढला आहे. जुलैमध्ये ९ टक्क्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये सोन्याच्या आयातीचा हिस्सा १४ टक्क्यांहून अधिक झाला आहे. सहसा, सोन्याची आयात अनावश्यक आयात मानली जाते, सरकार उच्च आयात शुल्क सारख्या विविध मार्गांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करते.

श्रीमंत सोनं खरेदी करत आहेत पण गरीब गहाण ठेवतायत

श्रीमंतांनी सोन्याचा साठा सुरू ठेवला असला तरी, सोन्याचे कर्ज घेतलेले समाजातील गरीब वर्ग त्यांचे कर्ज फेडू शकत नाहीत. यामुळे सोने कर्ज कंपन्यांनी लिलावात मोठी वाढ नोंदवली आहे.

सहसा, सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव सुवर्ण कर्ज कंपनीद्वारे केला जातो जेव्हा कर्जदार सोने गहाण ठेवल्यानंतर घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही.

मणप्पुरम फायनान्स सारख्या कंपन्यांनी एप्रिल-जून तिमाहीत त्यांचे लिलाव वाढताना पाहिले. मन्नापुरम फायनान्सने या कालावधीत ४.५ टन सोन्याचा लिलाव केला, जो मागील तिमाहीत १ टन होता.

डी. के. श्रीवास्तव, EY चे मुख्य धोरण सल्लागार म्हणाले की श्रीमंत सोनं खरेदी करत आहेत आणि गरीब गहाण ठेवत आहे यांचा हा विरोधाभास भारताच्या आर्थिक रिकव्हरीचे असमान स्वरूप दर्शवते.

“गरीब लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुवर्ण कर्ज घेत आहेत परंतु, ते कर्जफेड करण्यास सक्षम नाहीत. दुसरीकडे, ज्यांना परवडेल ते सोन्यामध्ये चांगलये परताव्याच्या अपेक्षेने आणि तिसऱ्या लाटेच्या अपेक्षेने गुंतवणूक करत आहेत” डी. के. श्रीवास्तव सांगतात.

“हे भारताच्या असमान आर्थिक रिकव्हरीचे प्रतिबिंब आहे. अर्थव्यवस्थेचे औपचारिक क्षेत्र उंचावले आहे आणि अर्थव्यवस्थेच्या वाजवी वाढीच्या हे कामगिरीचे मुख्य कारण आहे, अनौपचारिक क्षेत्र अद्याप साथीच्या आजारामुळे झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीतून सावरू शकलेले नाही. ”

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paradox the poor mortgage gold the rich buy it 200 per cent increase in imports ttg