डॉ. आशीष थत्ते
उद्योगधंद्यांमध्ये संबिंदू (ब्रेक इव्हन पॉइंट) गाठणे महत्त्वाचे असते. आपणसुद्धा आयुष्यात संबिंदू गाठतो. आपल्यापैकी खूप लोक तत्त्व पाळून आयुष्य जगतात आणि यशस्वीसुद्धा होतात. तुमची तत्त्वे ऐकताना सुरुवातीला लोक कदाचित तुमची टिंगलदेखील करतात, पण चांगली तत्त्वे पाळणारे नक्कीच यशस्वी होतात. कुठल्या तरी एका वेळेला किंवा प्रसंगाला नक्की आपल्याला असे वाटते की, आपण संबिंदू गाठला आहे आणि यापुढे नक्की यशस्वी होऊ. विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना लक्ष्य कितीही मार्काचे असले तरी कुठे तरी एका बिंदूवर त्यांना वाटते की, आपले लक्ष्य नक्की पूर्ण होणार. म्हणजे तुम्ही संबिंदू गाठला आहे असे समजावे. राजकारण किंवा खेळातसुद्धा असे होते. एका विशिष्ट बिंदूपर्यंत तोटय़ातच चालले आहे असे वाटत राहते किंवा आपला रस्ता चुकला असे वाटते. पण एका विशिष्ट बिंदूनंतर यश नक्की मिळते. थोडेसे तात्त्विक वाटले तरी सत्य नक्कीच असे आहे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा