डॉ. आशीष थत्ते
‘ब्रेक इव्हन’चे मराठी भाषांतर फारच कठीण आहे म्हणून याला सध्या संबिंदू असे म्हणू. उद्योगामध्ये संबिंदू गाठणे फारच महत्त्वाचे असते. कारण खरा नफा हा त्या बिंदूनंतर असतो. ना नफा-ना तोटा अशा स्थितीत लहान उद्योगांना कदाचित लवकर येता येते. मात्र त्यांचा नफादेखील तेवढाच कमी असतो. मोठय़ा उद्योगांना मात्र संबिंदूला पोहोचेपर्यंत खूप मेहेनत घ्यावी लागते. मात्र त्यानंतर त्यांचा नफादेखील खूप मोठा असतो. मोठे उद्योग जसे की, सिमेंट, विमानसेवा किंवा नवीन उद्योगांमध्ये दूरसंचार वगैरे ज्यात सुरुवातीची गुंतवणूक प्रचंड असते. पण जेव्हा तुम्ही संबिंदूला पोहोचता तेव्हा तुम्ही खरे जिंकलेले असता. म्हणून नवीन उद्योग चालू करताना आपण संबिंदूला कधी पोहोचू याचे ठोकताळे पहिले मांडले जातात. जेवढय़ा लवकर संबिंदूला पोहोचणे म्हणजे नंतरचा नफा लवकर मिळणे. अर्थ आणि वित्त या दोन्ही शाखांमध्ये या विषयावर विपुल लिखाण केले गेले आहे. त्यामुळे त्याचे सूत्र खूप ठिकाणी वाचायला मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा