द्विमासिक पतधोरण आढाव्यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीतून रिझव्र्ह बँक रेपो दरात कपात करणार किंवा नाही हा गहन प्रश्न आहे. रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सातत्याने रेपो दरात कपात न केल्याबद्दल त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात राजकारण्यांच्या अवहेलनेला सामोरे जावे लागले होते. माजी अर्थमंत्र्यांकडून विकासाच्या मार्गावर एकटय़ाने वाटचाल करण्याचा जाहीर केलेला मनोदय वजा उपहासात्मक टिपण्णी, रिझव्र्ह बँकेच्या स्वायत्ततेचे भान न बाळगता हीन पातळीवर जाऊन केलेली टीका यांचा अनुभव सुब्बाराव यांनी घेतला. आज विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वर्तन त्यांच्या पूर्वसूरीच्या परंपरेचे पालन करणारी आहे. वेगगळ्या उद्योग व व्यापारी संघटना यांनी व्याज दरकपातीच्या केलेल्या मागणीच्या सूरात सूर मिळवत रिझव्र्ह बँकेवर दरकपातीसाठी दबाव कायम ठेवण्याचे काम अरुण जेटली यांनी कर्तव्य-तत्परतेने बजावले. केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महागाई कमी झाली अशी मोदी भक्तांकडून हाकाटी पिटली जात आहे. तेलाच्या किंमती कमी होण्याचा आणि केंद्रात झालेल्या सत्ता बदलांचा काहीही संबंध नाही, हे मोदी भक्त मान्य करण्याच्या मनस्थितीत नाहीत.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्याशी मागील आठवड्यात झालेल्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान रेपो दर कपाती बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ‘‘रेपो दर कपातीचा निर्णय केवळ महागाईच्या दरावर ठरत नसतो. रिझव्र्ह बँकेला महागाईच्या दराच्या पलीकडे अनेक गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात,’’ असे सूचक उदगार काढले. रेपो दराचा निर्णय घेण्याआधी महागाई दराच्या पलीकडे नक्की काय पाहिले जाते, याचे हे ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांसाठी दोन तज्ज्ञांकडून उद्बोधन..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा