लॉकडाऊन काळात असंख्य ग्राहकांनी मोबाईल, वीजबिल किंवा इतर बिलं भरण्यासाठी ऑनलाईन बँकिंगचा पर्याय निवडला. अनेक ग्राहक Gpay, Phonepay अशा Online Payment पर्यायांचा वापर करू लागले. तर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी Auto-debit Payment या पर्यायाचा देखील वापर केला आहे. एका आकडेवारीनुसार देशभरात सुमारे २ हजार कोटी रुपयांची सेवांबाबतची बिलं ही ऑटो डेबिट पेमेंड सुविधेच्या माध्यमातून चुकती केली जातात. पण आता ही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. आणि फार लांब नाही, तर १ एप्रिलपासूनच ही सुविधा बंद होऊ शकते. द न्यूज मिनटने दिलेल्या वृत्तानुसार IAMAI अर्थात Internet And Mobile Association of India या सेवापुरवठादारांच्या संघटनेने तसा इशारा दिला असून देशातल्या अनेक बँकांना त्यासाठी कारणीभूत ठरवलं आहे.

काय आहे Auto-Debit Payment?

financial terms used frequently
प्रतिशब्द : केल्याने व्याज कर्तन
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharera builders Crore outstanding Homebuyer Thane, Raigad, Palghar
जिल्हा प्रशासन ढिम्म .. महारेरा हतबल ! ठाणे, रायगड, पालघर मधील घरखरेदीदारांचे २०२.७८ कोटींचा परतावा थकीत
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Budget 2025 News Tax regime slabs
१ हजार रुपये अधिक उत्पन्नामुळे ६० हजारांचा फटका, टॅक्सच्या भितीने नोकरदारांवर पगार कमी करून घेण्याची वेळ
New Tax Slab
१२ लाखांहून कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठीही टॅक्स स्लॅब, त्याचा नेमका अर्थ काय?
Budget 2025 Cancer drugs to get cheaper as govt announces major healthcare reforms
Union Budget 2025 : कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिलासा; औषधं होणार स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा
indian banks facing various challenges amid high interest rate
भारतीय बँकांना नफ्याला कोरड; जगातिक संस्थेचा इशारा नेमका काय?

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या सेवा वापरत असतो. त्यांची बिलं वेळेवर भरली गेली नाहीत, तर संबंधित सेवा खंडित होऊ शकते. मग त्यात विजबिलांपासून ते Amazon, NetFlix सारखे OTT प्लॅटफॉर्म्सपर्यंत अनेक सेवांचा समावेश येतो. त्यामुळे अशा वेळी Online Payment चा एक भाग असलेली ऑटो डेबिट पेमेंटची सुविधा बँकांकडून दिली जाते. याचा अर्थ संबंधित सेवेची माहिती आपण बँकांनि पुरवलेल्या ठिकाणी भरली, की दर महिन्याला तयार होणारं बिल आपोआप आपल्या खात्यामधून भरलं जाणार. म्हणजे तेवढी रक्कम आपल्या खात्यातून वजा होणार. त्यामुळे बिल भरण्यास विसरल्यामुळे संबंधित सेवा खंडित होण्याची पाळी आपल्यावर येत नाही.

मग आताच अचानक काय झालं?

आत्तापर्यंत ही सेवा अगदी सुखेनैव सुरू होती. पण आता इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं बँकांची तक्रार केली आहे. RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घालून दिलेल्या नियमांचं पालन बँकांकडून केलं जात नसल्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा इशारा आयएमएआयनं दिला आहे. यामध्ये थेट बँक खात्यातून किंवा एटीएम कार्डमधून अदा केल्या जाणाऱ्या बिलांचा देखील समावेश आहे.

काय आहेत हे नवे नियम?

१. पेमेंटच्या तारखेपासून ५ दिवस आधी बँकांनी ग्राहकांना त्यासंदर्भात विचारणा करणारी माहिती द्यावी आणि ग्राहकांच्या परवानगीनंतरच खात्यातून पैसे वर्ग करावेत.

२. ५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बिलं अदा करताना परवानगीसाठी बँकांनी ग्राहकांना वन टाईम पासवर्ड पाठवावा.

यासाठी आवश्यक प्रणाली तयार करण्यासाठी बँकांना ३१ मार्चपर्यंतचा अवधी देण्यात आलेला आहे. मात्र, अजूनही बँकांनी त्यावर कार्यवाही केली नसल्यामुळे त्याचा फटका लाखो ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वैयक्तिक ग्राहक आणि कंपन्यांचा देखील समावेश आहे. या परिस्थितीमध्ये अनेक सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना पेमेंट करण्याचे इतर मार्ग सुचवायला सुरुवात केली आहे.

BHIM UPI द्वारे पेमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागतोय? इथे करा तक्रार

काय आहे पर्याय?

जर बँकांनी योग्य ते बदल केले नाहीत, तर ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवठादाराच्या वेबसाईटवर किंवा इतर पेमेंट संकेतस्थळांवर जाऊन पेमेंट करावं लागणार आहे.

Story img Loader