Acharya Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतातील खूप मोठे विद्वान होते. चाणक्य यांनी नीति शास्त्राची रचना केली. ज्याला ‘चाणक्य निती’ या नावाने ओळखले जाते. चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.  चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतिमध्ये मुलांच्या संगोपनावर वारंवार भर दिला आहे की, पालकांनी आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण बनवावे, त्यांची काळजी घ्यावी आणि त्यांना वाया जाऊ देऊ नये.

मुलांची पहिली शाळा त्यांचे स्वतःचे घर असते. इथेच त्याच्यांवर संस्कार होतात. एक लहान मूल निरागस असते. तो त्याच गोष्टींचे अनुसरण करतो जे तुम्ही त्याच्यापुढे करता. म्हणूनच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांबद्दल खूप गंभीर असले पाहिजे आणि चांगल्या वर्तनाचे उदाहरण ठेवले पाहिजे. चाणक्यांनी सांगितले आहे की, जर घरातील मुलगा वाईट असेल म्हणजेच चांगले कर्म करणारा नसेल तर तो संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो.  

school principal misconduct with female teacher
महिला पालक, शिक्षिकांना अपरात्री फोन, अश्लील संभाषण, मुख्याध्यापकावर आरोप, काय आहे प्रकरण?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Pm Modi in Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha : मोदीसरांचा क्लास! मुलांना अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून सांगितला ‘क्रिकेट’ मंत्र, ‘परीक्षा पे चर्चा’ मधल्या त्या प्रश्नाची चर्चा
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
Karan Johar
करण जोहरने मुलांची नावे यश आणि रुही का ठेवली? फोटो शेअर करीत सांगितलं कारण, म्हणाला…
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Shivraj Rakshe Mother Said This Thing
Shivraj Rakshe : शिवराज राक्षेच्या आईचा सवाल, “पंचांवर कारवाई का नाही? त्यांनी माझ्या मुलाला शिवीगाळ केली आणि…”

एकेन शुष्कवृक्षेण दह्यमानेन वह्निना । 

दह्यते तद्वनं सर्वं कुपुत्रेण कुलं यथा ॥

या नीतीमध्ये चाणक्य श्लोकांच्या माध्यमातून सांगत आहेत की, ज्याप्रमाणे एखाद्या सुकलेल्या झाडाला आग लागली की संपूर्ण जंगल जळून राख होते. त्याचप्रमाणे, एका वाईट मुलामुळे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले तर. दुष्ट आणि अवज्ञाकारी मुले संपूर्ण घराचा सन्मान नष्ट करतात आणि संपूर्ण कुळाचा नाश करतात, असे ते सांगतात.

(हे ही वाचा : Chanakya Niti: घरात गरीबी येण्याआधी मिळतात ‘हे’ ५ संकेत; तुम्हालाही दिसल्यास ओढावू शकते दारिद्र्य, वेळीच व्हा सावध! )

चाणक्य म्हणायचे, जंगलातील एक झाड जरी सुकले आणि आग लागली, तर आजूबाजूची झाडे जरी हिरवीगार असली, तरी ते सुकलेले झाड संपूर्ण जंगलाला आगीत वेढून टाकते आणि संपूर्ण जंगल जळून खाक होतो. त्याचप्रमाणे वाईट प्रवृत्ती असलेले मूल कितीही सुंदर असले तरी एक ना एक दिवस ते कुटुंबाचा आणि कुळाचा अभिमान नष्ट करतात. समाजात त्याच्या वाईट वागणुकीमुळे कुटुंबाला अपमान सहन करावा लागतो. एक दुष्ट मुलगा संपूर्ण कुटुंबाचा आदर आणि सन्मान नष्ट करू शकतो, असे चाणक्यांनी नमूद केले आहे.

मुलांवर संस्कार करणे खूप महत्वाचे

चाणक्य म्हणतात की, मुलांच्या वाईट सवयींकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांना वेळीच सुधारणे खूप महत्वाचे आहे. कुटुंबाचा विनाश थांबवायचा असेल तर मुलांना नियंत्रणात ठेवा आणि त्यांच्या संस्कारांकडे लक्ष द्या. एक उत्कृष्ट आणि आज्ञाधारक मूल संपूर्ण कुळ पुढे नेतो. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण व संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर भविष्य अंधारात असेल, असे ते सांगतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader