Chanakya Niti for Success: आयुष्यात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते, त्यामुळे प्रत्येक जण जीव तोडून मेहनत करत असतो. यात काहींना यश लवकर मिळते, पण खूप प्रयत्न करूनही अनेकांना यश मिळत नाही. अशावेळी लोक हताश निराश होतात, यशाचे नवे मार्ग शोधण्यासाठी धडपड करतात. अशा लोकांसाठी आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.

आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी नैतिकतेचे धोरण तयार केले होते; नीतिशास्त्रामध्ये त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने जीवनात कोणती मूल्ये पाळली पाहिजेत? व्यक्तीचे जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी नीतिशास्त्रात अनेक उपयुक्त सल्ले देण्यात आले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत.

14 June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१४ जून पंचांग: दुर्गाष्टमीला सिद्धी योगामुळे १२ राशींच्या नशिबात घडतील मोठे बदल; लक्ष्मी कोणत्या राशीत देईल तुम्हाला आशीर्वाद?
13th June Marathi Panchang Guru Gochar In Rohini Nakshtra Swami To Bless Mesh To Meen Rashi
१३ जून पंचांग: गुरुवारी स्वामी ‘या’ राशींवर धरणार कृपेचं छत्र; मेष ते मीन राशींपैकी कुणाचं पारडं होणार धनसुखाने जड, वाचा
Shukra Uday 2024
३० जूनपासून ‘या’ राशींमध्ये होणार मोठ्या उलाढाली; शुक्रदेव उदय स्थितीत येताच नशीबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Influence of Jupiter for 118 days Lakshmi in the house
११८ दिवस गुरुचा प्रभाव; ‘या’ चार राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; कमवाल बक्कळ पैसा
After 4 days godess Lakshmi bless you The golden time
४ दिवसांनंतर घरी नांदणार लक्ष्मी; ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींचा सुरू होणार सुवर्णकाळ, मिळणार पद-प्रतिष्ठा अन् धन-संपत्तीचे सुख
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Numerology Studies: Shani Blessing Birthdates
२०२ दिवस शनी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना देणार श्रीमंतीसह नाते जोडण्याची शक्ती, तुमच्या कुंडलीत आर्थिक बळ कसंय?
Shukra Nakshatra Parivartan
१८ जूनपासून ‘या’ ४ राशी होतील आनंदी? शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने श्रीमंत होण्याची संधी चालत येऊ शकते तुमच्या दारी

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जीवनात आचरणात आणल्यास व्यक्ती अपेक्षित यश मिळवू शकतो. उलट, प्रत्येक मार्ग त्याच्यासाठी सोपा होऊ शकतो. यश मिळवण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये नेमके काय सल्ले दिले आहेत जाणून घेऊया.

यश मिळवण्यासाठी ‘या’ पाच गोष्टी ठेवा लक्षात

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्र चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीचे ध्येय जितके मोठे असेल तितकी आव्हानेही मोठी असतील. तरीही जर एखाद्या व्यक्तीने काही गोष्टींचे पालन केले तर ती व्यक्ती मोठ्या आव्हानांवरही मात करू शकते आणि आपले ध्येय साध्य करू शकते.

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे? मग आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ चार गोष्टी ठेवा लक्षात

१) इतरांच्या चुकांमधून धडा घ्या : आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, स्वतःच्या चुकांमधून शिकण्यासाठी खूप वेळ लागतो. पण, इतरांच्या चुकांमधून शिकणे आणि त्या चुका स्वतः न करणे चांगले असते. असे केल्याने अपयशाची शक्यता कमी होते आणि यश लवकर मिळते.

२) प्रयत्न : यश मिळवण्याचा पहिला नियम म्हणजे हार मानू नका. आपण आपले ध्येय साध्य करेपर्यंत मागे हटू नका किंवा आपले प्रयत्न कमी होऊ देऊ नका. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.

३) अपयशाला घाबरू नका : अपयशानंतर घाबरू नका किंवा मागे हटू नका. आपल्या चुकांसाठी पश्चात्ताप करू नका. त्यापेक्षा पराभवानंतर पुढच्या टप्प्यासाठी स्वत:ला तयार करा आणि पुढे जा.

४) अशा ठिकाणी राहू नका : जिथे तुमचा आदर केला जात नाही अशा ठिकाणी राहू नका किंवा त्या ठिकाणी थांबू नका, जिथे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखले जाते. तुमच्या स्वाभिमान आणि प्रगतीशी तडजोड करू नका.

५) नशिबावर विसंबून राहू नका : जे नशिबावर अवलंबून असतात त्यांना पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येत नाही, त्यामुळे नशिबावर कधीही अवलंबून राहू नका; तर तुमच्या समर्पण, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे जा. अशी व्यक्ती अगदी कठीण परिस्थितीवरही मात करते आणि आपले ध्येय साध्य करते.