आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढी एकादशीनिमित्त असंख्य भक्त पायी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्रातील परंपरा आहे.
सध्या आषाढ महिना सुरू आहे. राज्यातून विविध भागांतून येणारे लोक पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले. या वर्षी आषाढी एकादशी केव्हा आहे? आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

हेही वाचा : Name Astrology : ‘A’अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? नावाचे पहिले अक्षर सांगते व्यक्तिमत्त्व

Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat in Marathi
Diwali Lakshmi Puja 2024 : ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर? तुमच्या शहरानुसार जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाची योग्य तारीख अन् मुहूर्त
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
Kartik Month Rashifal
‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा
Sun Transit In Libra 2024
उद्यापासून सूर्याचा जबरदस्त प्रभाव; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
uma mani the coral woman of india
उमा मणी… गृहिणी ते कोरल वुमनचा कलात्मक प्रवास
Charlotte Wood novel Stone Yard Devotional
बुकरायण: आस्तिक-नास्तिकतेचे मुक्त चिंतन…
Navratri 2024
Navratri 2024:नऊ दिवस, दहा प्रश्न – करूया देवीचा जागर!
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

आषाढी एकादशी केव्हा आहे?

हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशी महाराष्ट्रसह देशभरात २९ जून २०२३ रोजी गुरुवारी साजरी करण्यात येईल.

आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त

आषाढी एकादशी २९ जूनला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होणार असून एकादशीची समाप्ती ३० जून पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे.

हेही वाचा : तळहातावर जर ‘V’आकाराचे चिन्ह असेल तर नशिबाला मिळेल कलाटणी? मिळू शकतो अपार पैसा

आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पूजा

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हटले जाते. पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू बळीराजाच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीचा असतो आणि कार्तिकी एकादशीला परत येतात. त्यामुळे या दोन्ही एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पांडुरंग किंवा विठ्ठल हे श्री विष्णूचे अवतार मानले जातात. त्यामुळे आषाढी एकादशीला लाखो भक्त विठ्ठलाची आराधना करतात आणि पंढरपूरला जातात. या दिवशी विठ्ठलाची आराधना केली जाते. असे म्हणतात की पहाटे स्नान करून विष्णू किंवा विठ्ठलाची पूजा करावी. संपूर्ण दिवस एकदशीचे व्रत करावे आणि हरिभजन करून देवाचे नामस्मरण करावे, असे मानले जाते.