ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलत असतो. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी तर शनि अडीच वर्षानंतर राशी बदलतो. खरं तर या वर्षात बरेच ग्रह राशी बदलणार आहे. शनिही अडीच वर्षानंतर राशी बदल करणार आहे. गोचराच्या कमी अधिक कालावधीमुळे काही ग्रह एका राशीत एकत्र तेव्हा योग जुळून येतात. त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी महिना खास असणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे या महिन्यातही ग्रहांचे संक्रमण होणार आहे, परंतु यावेळी इतर ग्रहांसोबत काही विशेष योगायोग घडणार आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्याकडे जगभरातील ज्योतिषांचे लक्ष लागले आहे. या महिन्यात मकर राशीत ग्रहांचा दुर्मिळ योग तयार होणार आहे. फेब्रुवारीच्या शेवटी एकाच राशीत त्रिग्रही, चतुर्ग्रही आणि पंचग्रही योग तयार होतील. ज्योतिषशास्त्रात अशी घटना फार दुर्मिळ आहे. त्यामुळे या ग्रहयोगांमुळे पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालावरही परिणाम होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा