Chanakya Niti For Life : आचार्य चाणक्य हे एक महान तत्त्वज्ञानी आणि राजकारणी होते. त्यांनी नैतिकतेचे धोरण तयार केले होते; नीतिशास्त्रामध्ये त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीने जीवनात कोणती मूल्ये पाळली पाहिजेत? व्यक्तीचे जीवन सुखी आणि यशस्वी करण्यासाठी नीतिशास्त्रात अनेक उपयुक्त सल्ले देण्यात आले आहेत. आचार्य चाणक्य यांनी दान कोणाला आणि कसे करावे हे सांगितले आहे. दान केल्याने व्यक्तीला कोणते फायदे मिळतात हेही सांगण्यात आले आहे. आचार्य चाणक्य यांनी दानाबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊ…

दानेन पाणिर्ण तू कंकनेन स्नानेन शुद्धिर्ण तू चंदनेन.

shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Bada Naam Karange Hindi web series on Sony Liv
सहजता, साधेपणा जपण्याचा प्रयत्नख्यातनाम निर्माते दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे मत
Devotees take boat rides at the Sangam during ongoing Mahakumbh Mela, in Prayagraj, Uttar Pradesh, Friday, Feb. 7, 2025.
Mahakumbh 2025 : “महाकुंभमेळा चेंगराचेंगरीत मी माझी आई गमावली, आता तिच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी मला…”, मुलाने व्यक्त केली खंत
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…

मानेन त्रिपतिर्णा तू भोजनेन ज्ञानेन मुक्तिर्ण तू मंडनेन.

आचार्य चाणक्य यांचे नीतीशास्त्र सांगते की, व्यक्तीने नियमित दान करावे. तसेच व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दान करावे, दान केल्याने व्यक्तीला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. त्याचबरोबर दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि धनाचा ओघही कायम राहतो. त्याचबरोबर माणसाने आपल्या धर्माप्रमाणे खुल्या मनाने आणि खऱ्या मनाने दान करावे. धर्माच्या बाबतीत दान करण्यात कंजूष नसावे. जेव्हा माणूस दान करतो तेव्हाच शरीर शुद्ध होते.

नन्नोदकसम दानम् न तिथर्वादशी सम ।

न गायत्र्यः परो मंत्र न मातुर्दैवतम् परम् ।

आचार्य चाणक्य यांच्या मते, दान नेहमी अशा व्यक्तीला दिले पाहिजे; ज्याला खरोखर गरज आहे आणि तो दान केलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवेल. त्या पैशातून ती व्यक्ती ड्रग्ज वगैरे घेत असेल, तर ते योग्य नाही. तसेच कधीही स्वार्थाने परोपकार करू नये. असे दान व्यर्थ जाते. त्याचबरोबर चाणक्य सांगतात की, जी व्यक्ती मंदिर किंवा इतर धार्मिक संस्थांना दान देते, त्या व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. अशी व्यक्ती कौटुंबिक बाबींमध्ये आनंदी असते आणि त्याच्या घरात नेहमी शांतता असते. सुख आणि पुण्य मिळविण्यासाठी माणसाने दान केलेच पाहिजे, असे पुढे सांगितले आहे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा दावा लोकसत्ता डॉट कॉम करीत नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader