भारतातील विद्वानांपैकी आचार्य चाणक्य हे महत्त्वाचे विद्वान. चंद्रगुप्त मौर्य यांना महान राजा बनवण्यात त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्रात मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचा सविस्तर उल्लेख केला आहे. आजही ‘चाणक्य नीति’ ला खूप वरचा दर्जा दिला जातो. असं म्हणतात की जो कोणी या धोरणांचे पालन करेल तो नक्कीच यशाच्या पायऱ्या चढतो. चाणक्यांच्या अनेक धोरणांपैकी एक मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या धोरणानुसार तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्या तुम्ही कोणाशीही शेअर करू नयेत.

तुमच्या समस्या
महान विद्वान चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला कोणत्याही समस्येने घेरले असेल तर तुम्ही त्यावर उपाय देखील शोधला पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी मदत करेल, तर तसं नाही. कारण लाभाशिवाय कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. चाणक्य म्हणायचे की लोक तुमच्याशी शांतपणे बोलायला नक्कीच येतील, पण तुमच्या भल्यासाठी मदत करणार नाहीत. सहानुभूतीच्या नावाखाली ते तुमच्या अडचणीत असल्याची चेष्टा करतील. त्यामुळे तुमच्या समस्या स्वतःजवळ ठेवा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Sturggle Story
“शर्यत धावण्याची असो किंवा आयुष्याची…संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो!” चिमुकलीने केलं सिद्ध, Viral Video देतोय जगण्याची प्रेरणा
Acharya Chanakya's Chanakya Niti
Chanakya Niti: आयुष्यात प्रचंड पैसा अन् धन संपत्ती कमवायची असेल तर चाणक्य नीतिने सांगितलेल्या ‘या’ तीन सवयी अंगीकारा, मिळेल अपार श्रीमंती
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
Kshitee Jog
“सरसकट निर्मात्यांना अक्कल नसते….”, क्षिती जोग निर्माती होण्याआधी ‘असा’ करायची विचार; स्वत:च सांगत म्हणाली, “हेमंत फार हळवा होऊन…”

आणखी वाचा : Numerology : सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये ‘या’ खास गोष्टी असतात, जाणून घ्या…

पैशांची टंचाई
जर तुमच्या आयुष्यात पैशाची अडचण आली असेल, काही काम थांबले असेल आणि त्याचे कारण म्हणजे तुमचा रिकामा खिसा… तर तुम्ही विचार करत असाल की कोणाची तरी मदत घेऊया. पण प्रत्यक्षात तुम्हाला मदत मिळणार नाही. आधी सांगितल्याप्रमाणे, वैयक्तिक लाभाशिवाय कोणीही तुम्हाला मदत करत नाही. म्हणूनच पैसे मागितल्यावरही तो तुमच्यापासून दूर जाऊ लागेल आणि त्याच्या नजरेत तुमचा आदर कमी होईल. ही गोष्ट त्याच्या मनात नक्कीच येईल की जर तुमचे संबंध चांगले असतील तर तुम्ही नक्कीच पैसे मागाल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त तुम्हाला पैशांच्या समस्येने त्रस्त असल्याचे कोणालाही सांगू नका.

आणखी वाचा : Chanakya Niti: जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर चाणक्यांच्या या धोरणांचा अवलंब करा, पैशांचा पाऊस पडेल

कोणी करत असलेले गैरवर्तन
चाणक्यांच्या मते, जर कोणी गैरवर्तन करत असेल तर इतर कोणालाही मध्ये आणू नका. हे प्रकरण तुमच्याकडे राहू द्या. जर तुम्ही विचार करत असाल की इतर तुम्हाला मदत करतील तर तसे होणार नाही. उलट इतर लोक तुमची चेष्टा करतील. एवढेच नाही तर असं होऊ शकतं की तो तुमचा आदर करणार नाही. अशा स्थितीत तुमचे आणि इतर कोणाचे कडू नाते तिसर्‍याला सांगू नका. त्याच व्यक्तीशी बोलून तुमचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा : September Planet Gochar: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या चालीमध्ये होणार बदल, या ४ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

तुमच्या वैयक्तिक गोष्टी
चाणक्यांचा असा विश्वास होता की, एखाद्याने आपल्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नयेत, कारण तुमच्या बोलण्याचा फायदा घेऊन कोणीतरी तुमच्या विरोधात असू शकतं. कदाचित ती व्यक्ती तुमच्या त्रासाचे कारण बनते. तुमच्या अनुभवातून शिका आणि तुमचे वर्तन बदला. एखाद्याला खास समजून सांगितल्या गेलेल्या गोष्टी तुम्हाला फसवण्याचे साधन बनू शकतात.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader