आचार्य चाणक्य यांनी यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. अनेक जण त्यांच्या नीतीचे अनुकरण करतात. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीचे काही गुण सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

“प्रस्तावसदृशं वाक्यं प्रभावसदृशं प्रियम् । आत्मशक्तिसमं कोपं यो जानाति स पण्डितः॥” या श्लोकामधून चाणक्य सांगतात की, केव्हा काय बोलावे, कोणावर प्रेम करावे व किती राग करावा, या तीन गोष्टी ज्या व्यक्तींना माहिती असतात, त्या अत्यंत ज्ञानी व बुद्धिमान असतात.

asha bhosle on motherhood
“आताच्या स्त्रियांना मुलांना जन्म देणं हे ओझं वाटतं”, आशा भोसले यांचं स्पष्ट मत; स्वत:चं उदाहरण देत म्हणाल्या, “माझी तीन मुलं…”
26th September Rashi Bhavishya & Panchang
२६ सप्टेंबर पंचांग: दिवसाच्या सुरुवातीला ‘या’ राशींना होणार…
nitin gadkari
Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?
next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
vhp on ayan mishrea murder case
Aryan Mishra Murder : गोरक्षकांकडून आर्यन मिश्राची हत्या, हिंदुत्ववादी संघटनांनी हात झटकले; म्हणाले, “हिसांचाराचे समर्थन नाही”

हेही वाचा : Chanakya Niti : महिला नेहमी नोटीस करतात पुरुषांच्या ‘या’ सवयी, वाचा ‘चाणक्य नीती’ काय सांगते?

केव्हा काय बोलावे?

आचार्य चाणक्य सांगतात की, समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. काही व्यक्ती कोणताही विचार न करता काहीही बोलतात. अशा लोकांवर टीका केली जाते. याउलट जी माणसे विचारपूर्वक बोलतात त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असल्याचे दिसून येते. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार केव्हा काय बोलावे, हे माहीत असणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Chanakya Niti : बेस्ट फ्रेंडला चुकूनही सांगू नका ‘या’ पाच गोष्टी; भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम? वाचा, चाणक्य नीती काय सांगते…

कोणावर प्रेम करावे?

प्रत्येक व्यक्तीने योग्य व्यक्तीवर प्रेम करावे, असा सल्ला आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीद्वारे देतात. चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्यामुळे भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोणावर प्रेम करावे, याची जाण प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.

किती राग करावा?

राग हा नेहमी घातक असतो. कारण- रागाच्या भरात अनेक लोक स्वत:चे नुकसान करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. त्यामुळे किती राग करावा, हे ज्या व्यक्तींना कळते, त्या व्यक्ती अत्यंत ज्ञानी व समजूतदार असतात.