Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय देखील सांगितले आहेत. त्यांनी नीतिशास्त्रात जीवनातील अनेक बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. नीतिशास्त्रात सांगतिलेल्या धोरणांचा वेळीच अवलंब केला, तर जीवनात संकट येत नाहीत. नीतिशास्त्राप्रमाणे राहण्याचा किंवा वागण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. आचार्य चाणक्य यांनी स्त्री पुरुषां विषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. जसं की स्त्री पुरुषांनी आपल्या गोष्टी कधीच कुणासमोर सांगू नये नाहीतर याने भविष्यात त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कोणत्या आहेत या गोष्टी…

आर्थिक नुकसान

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जर तुमचं नुकसान झालं असेल तर ते कधीही कोणासमोर व्यक्त करू नये. कारण लोक याबाबत समोर दु:ख व्यक्त करतील पण प्रत्यक्षात मात्र आनंदी असतील. तसेच याऊलट तुमच्या मागेच बोलत बसतील. यामुळे तुमचा समाजातील सन्मान देखील कमी होतो. त्यामुळे पैशाचे नुकसान झाल्याचं कोणालाही सांगू नका. अन्यथा लोकं तुमच्यापासून दूर जाऊ शकतात.

Sudesh Bhosale
सुदेश भोसलेंनी सांगितलं आशा भोसले यांच्याबरोबरचं नातं; किस्सा सांगत म्हणाले, “तेव्हापासून मी त्यांना आई…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
why asha bhosle and lata mangeshkar always wore white saree
मी आणि दीदी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो कारण…; आशा भोसलेंनी सांगितली आठवण, म्हणाल्या, “रंगीत साड्या नेसल्या तर…”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Shiva
“मी शिवाशिवाय कुठेही…”, आईच्या मनाविरुद्ध जाऊन आशूचा स्वत:ला सिद्ध करण्याचा निर्धार; पाहा प्रोमो….
What is 'Johatsu'
Johatsu: एका रात्रीत माणसं गडप; जपानमधील थरकाप उडवणारा ‘जोहत्सू’ हा प्रकार नेमका आहे तरी काय?
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”

( हे ही वाचा: ८ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? ग्रहांचा राजा सूर्य देणार प्रचंड धनलाभाची संधी)

चारित्र्य

आचार्य चाणक्य यांच्या मते लग्न झालेल्या स्त्री-पुरुषांनी एकमेकांबद्दल आदर ठेवला पाहिजे. एकमेकांच्या चुका दाखवून देणं कमी केलं पाहिजे. यासोबत कुटुंबामध्ये होणारी भांडणे आपापसात सोडवावी. यासोबतच स्त्री किंवा पुरुष घरातील गोष्टींबद्दल बाहेरील कोणत्याही व्यक्तीला सांगत असेल तर त्याचा वाईट परिणाम वैवाहिक जीवनात पडू शकतो. कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगाल ती दरवेळी तुमच्या दुःखात सामील होईल असं नाही. वेळ आल्यावर ती तुमची चेष्टाही करू शकते.

बदनामी

आचार्य चाणक्य यांच्या मते जर तुमचा कोणी अपमान केला असेल तर ते कोणालाही सांगू नका. कारण ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगणार आहात ती व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा त्यावर हसू शकते. म्हणून तुमच्यासोबत झालेल्या अपमानाबद्दल कोणालाही सांगू नका.

Story img Loader