Chanakya Niti Tips : आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीचे आचरण- वर्तणूक यांचा खूप गांभीर्याने अभ्यास केला आहे आणि त्यानंतर आपल्या ‘चाणक्य नीती’मध्ये अशी कित्येक सूत्रे सांगितली आहेत; जी स्वीकारून व्यक्तीच्या कित्येक समस्यांना तोंड दिले जाऊ शकते. आपल्या नीतीशास्त्रामध्ये त्यांनी अशा तीन परिस्थितींबाबत सांगितले आहे; ज्यामध्ये व्यक्तीने कोणालाही उत्तर देऊ नये, वचन देऊ नये व कोणताही निर्णय घेऊ नये; अन्यथा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदी असताना देऊ नका वचन

आचार्य चाणक्यांच्या मतानुसार, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा कोणतेही वचन देऊ नका; अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. कारण- जास्त आनंदी असलेल्या व्यक्ती कधी कधी असे वचन देऊन बसतात; जे त्या पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे ‘चाणक्य नीती’मध्ये सांगितले आहे की, वचन नेहमी विचार करून द्यावे.

हेही वाचा – चाणक्य निती : अशा पुरुषांकडे आकर्षित होतात महिला! कसा असावा जोडीदार? जाणून घ्या

रागामध्ये कोणालाही देऊ नका उत्तर

व्हा तुम्ही रागात असता तेव्हा कोणालाही उत्तर देऊ नका. कारण- रागाच्या भरात तुम्ही स्वत:वरील ताबा गमावता. मग अशा वेळी कधी कधी आपण अशा गोष्टी बोलून जातो; ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखवू शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि अशी वेळ टाळण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा – Chanakya Niti : श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवायलाच पाहिजे, वाचा, चाणक्य नीती काय सांगते?

दु:खी असताना कधीही घेऊ नका निर्णय

दु:खात असताना कोणताही निर्णय घेऊ नये. कारण- अशा स्थितीमध्ये महत्त्वाचा निर्णयदेखील चुकीचा ठरू शकतो; ज्यामुळे भविष्यात एखाद्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘चाणक्य नीती’नुसार दु:खी असताना भावनावेगात नव्हे, तर बुद्धीचा वापर करून निर्णय घेतला पाहिजे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti tips in which situations the decision should not be taken snk
Show comments