Chanakya Niti : यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल, तर चाणक्य नीतीचे जीवनात अवश्य पालन करा. असे म्हणतात की, चाणक्य नीती गरिबांनाही श्रीमंत बनवते. जाणून घ्या श्रीमंत होण्यासाठी आचार्य चाणक्य काय सांगतात ….

नेहमी प्रामाणिकपणे वागा

चाणक्य नीतीनुसार यशस्वी होण्याचे पहिले सूत्र म्हणजे कामाबद्दलचा प्रामाणिकपणा. कष्ट करणाऱ्यांवर व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी कृपा करते. चाणक्य नीती सांगते की, संकटाच्या वेळी लोक अनेकदा चुकीच्या मार्गावर जातात. दुसरीकडे जे कठीण प्रसंगातही आपले काम प्रामाणिकपणे करतात, त्यांची मेहनत वाया जात नाही. असे लोक गरिबीवर मात करून लवकर श्रीमंत होतात.

Fasting On Navratri? These Tips Will Make Sure Your Nine Days Are A Breeze Diet Tips Ashadhi Ekadashi Upwas Fasting
Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Lumps keep growing in your furniture at home
घरातील फर्निचरमध्ये ढेकूण सतत वाढत आहेत? ‘या’ सोप्या जालीम उपायांनी ढेकणांना लावा पळवून
religious reforms, festivals, celebrations
अन्य धर्मीयांनी बदलावे मग आम्ही बदलू, यासारखा अविवेक नाही!
सेकंड हॅण्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? त्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या
after controvrcial remark on rahul gandhi bonde said in sense my statement makes mother angry with child
नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
going to bed with a full stomach may cause backache cause a back pain
पोटभर जेवल्यानंतर लगेच झोपू नका! पाठदुखी टाळण्यासाठी सदगुरुनी दिला सल्ला, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात?
human personality mask
जिंकावे नि जगावेही: मुखवट्यांच्या आड

जबाबदाऱ्या योग्य वेळी पार पाडा

आचार्य चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्या योग्य वेळी पार पाडते, ती कधीही अपयशी ठरत नाही. असे लोक लक्ष्मी देवीला प्रिय असतातच; पण त्यांना कुबेराचाही आशीर्वाद मिळतो. म्हणूनच तुमची जीवनशैली नेहमी शिस्तबद्ध ठेवा.

हेही वाचा – कोणत्याही व्यक्तीसाठी ‘या’ चार ठिकाणी राहणे म्हणजे मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

नेहमी चांगले कर्म करा

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीचे कर्म त्याच्या वाईट आणि चांगल्या काळाचे कारण ठरते. चांगल्या काळात कधीही पद आणि पैशाचा गर्व करू नका. वाईट काळात संयम गमावू नका. असे करणाऱ्या व्यक्तीला कधीही दुःखाची जाणीव होत नाही आणि त्यांचे आयुष्य आनंदाने जगतात.

वाणी आणि वतर्णुकीवर नियंत्रण ठेवा

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीच्या यश आणि अपयशात वाणी व वतर्णूक या दोन गोष्टींचा मोठा वाटा असतो. बोलण्यावर नेहमी नियंत्रण ठेवा. त्याचबरोबर तुमच्या वागण्याने कोणत्याही व्यक्तीचे कधीच मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

हेही वाचा – धनलाभ झाल्यानंतर करू नका ‘या’ चुका अन्यथा…. जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

ध्येयावर लक्ष केंद्रित करा

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी लक्ष केंद्रित केले पाहिजे. हे एखाद्या व्यक्तीला त्याचे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तसेच कामातही लवकर यश मिळते.