Chanakya Niti To Become Rich : महापंडित चाणक्य हे पृथ्वीवर जन्माला आलेल्या सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक मानले जातात. यामुळेच त्यांना भारतीय अर्थशास्त्र, राजकारण आणि मुत्सद्देगिरीचे जनक देखील म्हटले जाते. कोणत्याही व्यक्तीला जीवनात यश मिळविण्यासाठी त्यांनी बनवलेल्या धोरणांचा खूप फायदा होतो आणि याद्वारे एक चांगले आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मदत होते. जर तुमचे करिअर चांगले चालत नसेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही चाणक्यांची काही धोरणे अवलंबली पाहिजेत. विशेषत: तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि पैशांबाबत खूप समस्या असतील तर आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले काही उपाय सांगत आहोत.

व्यवसायाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे
तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर चाणक्य नीति तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आधी मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. आज अनेक लाइफ एक्सपर्ट्स सुद्धा चाणक्य नीतिमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कामाचा अनुभव घेण्याची शिफारस करतात. म्हणूनच बरेच लोक आधी नोकरी करतात आणि नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करतात.

true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
A budget that makes you aware of your limitations
वित्त: मर्यादांची जाणीव करून देणारा अर्थसंकल्प
what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
Declining financial and government credibility
घसरण आर्थिक आणि सरकारच्या विश्वासार्हतेचीही!
Loksatta editorial challenges before fm nirmala sitharaman in union budget 2025
अग्रलेख: सीतारामन ‘सिंग’ होतील?
review of impact on india stock market and economy after donald trump comes to power
Money Mantra : ट्रंप यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे आपलं आयुष्य का बदलणार?

आणखी वाचा : व्यवसायाचा दाता बुध होणार वक्री, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता

व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे लागेल
आचार्य चाणक्य म्हणतात की, कोणत्याही व्यक्तीने फक्त त्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांचं संपूर्ण लक्ष त्याच गोष्टीवर असायला हवं की तो आपला व्यवसाय किंवा करिअर कसं वाढवता येईल. अर्जुनने ज्या प्रकारे माशाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित केले, त्याच पद्धतीने लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश मिळू शकते. जोपर्यंत तुम्ही तुमची पूर्ण मेहनत त्याला देत नाही तोपर्यंत आजच्या स्पर्धेच्या युगात यश मिळू शकत नाही, मग ते कोणतेही क्षेत्र असू द्या.

आणखी वाचा : Pitru Paksha 2022: ‘या’ तारखेपासून सुरू होतोय पितृपक्ष पंधरवडा, जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

हिशेब स्पष्ट ठेवले पाहिजेत
आचार्य चाणक्य म्हणतात की, इतरांच्या संपत्तीची स्वतःच्या संपत्तीशी कधीही तुलना करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्ही नेहमी अस्वस्थ राहाल आणि आयुष्यात काहीही करू शकणार नाही. आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की प्रत्येकाने नेहमी हिशेब व्यवस्थित ठेवला पाहिजे. जे लोक स्वतःच्या दृष्टीने चांगले नाहीत, ते आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाहीत.

आणखी वाचा : September Planet Gochar: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या चालीमध्ये होणार बदल, या ४ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

गरिबांना दान करा
हिंदू धर्मातील दानाचे महत्त्व आपल्याला माहीत आहे. जेव्हा घरामध्ये जेवण बनवली जातं तेव्हा सर्वप्रथम गायीला खायला दिलं जातं. शास्त्रात आणि पुराणातही याला खूप महत्त्व दिले गेले आहे. म्हणून दानधर्म करावा. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान द्या. असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होतो. यामुळे गरीब लोकांचा आशीर्वाद मिळून तुमचा व्यवसायही उत्तम होईल.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader