Guru Nakshatra Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत आहे त्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतात. गुरूच्या नक्षत्र परिवर्तनालाही खूप खास मानले जाते. गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव काही राशींच्या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात पडतो.

पंचांगानुसार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी गुरू ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. गुरू रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये असेल. रोहिणी नक्षत्र हे २७ नक्षत्रांमध्ये चौथ्या क्रमांकाचे नक्षत्र असून त्याचा राशी स्वामी शुक्र आहे.

गुरू देणार तीन राशींच्या व्यक्तींना आनंदी आनंद

वृषभ

गुरू ग्रह या राशीच्या लग्न भावात असून याचा प्रभाव वृषभ राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक पाहायला मिळेल. या काळात तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि भौतिक सुखाची प्राप्तीही होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. आध्यामिक कार्यात मन रमेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा तुम्ही पूर्ण करून घ्याल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. तसेच पदोन्नतीही मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना गुरूचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे असेल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. भौतिक सुखातही वाढ होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल. समाजात नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तीर्थक्षेत्रांना आवर्जून भेट द्याल.पगारवाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य द्याल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)