Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळतो, तर काही राशीच्या व्यक्तींना अडचणींना समोरे जावे लागते. येत्या जुलै महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्याचा सकारात्मक प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

ज्योतिषशास्त्रानुसार ७ जुलै रोजी भौतिक सुखाचा कारक ग्रह असलेल्या शुक्र ग्रहाचे कर्क राशीत प्रवेश होईल, तसेच १२ जुलै रोजी ग्रहांचे सेनापती असलेल्या मंगळ ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश होईल, वृषभ राशीत देवगुरु बृहस्पति आधीपासूनच विराजमान आहेत. त्यानंतर १६ जुलै रोजी सूर्याचा कर्क राशीत प्रवेश होईल, या राशीमध्ये देखील बुध आणि शुक्र आधीपासून उपस्थित असतील. त्यानंतर १९ जुलै रोजी बुध ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करील. या चार ग्रहांच्या राशी परिवर्तनाने अनेक शुभ योग निर्माण होतील, ज्याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात पाहायला मिळेल.

कन्या

जुलै महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रत्येक क्षेत्रात हवे तसे यश मिळेल.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनादेखील जुलै महिन्यात होणारे राशी परिवर्तन फायद्याचे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडिल धाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल.

हेही वाचा: आजपासून कमावणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

मीन

मीन राशीच्या लोकांसाठीदेखील जुलैमधील ग्रहांचे राशी परिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. कामाव्यतिरिक्त इतर छंद जोपासाल, आयुष्यातील अडथळे दूर होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)