Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचांगानुसार, सूर्य ६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी धनिष्ठा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला धनलाभ होईल. आरोग्य चांगले राहिल. कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण व्यत्तीत कराल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळेल. कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना या राशी परिवर्तनाचा खूप फायदा होईल. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय होईल. वाहन, संपत्ती, घर खरेदी करू शकता. व्यवसाय, नोकरीत लाभ मिळेल. नोकरी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनाही नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असला तरीही या परिवर्तन राजयोगाने तुम्हाला खूप फायदा होईल. भाग्याची साथ मिळेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. अडकलेले पैसा परत मिळतील. कराल त्या कामात यश मिळवाल. समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. सरकारी नोकरीसाठी मेहनत घेत असलेल्यांना यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. पगारवाढ होईल. अविवाहितांचे लग्न ठरेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)