मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर नातं आहे. जेव्हा व्यक्ती अडचणीत असते तेव्हा एक चांगला मित्रच मदतीला धावतो. एक चांगला मित्र सुख-दु:खात नेहमी बरोबर असतो; पण कधी कधी खूप जवळचे मित्रही गरज असेल त्या नेमक्या वेळेला धोका देतात. खरे मित्र कसे ओळखावेत, हे खूप मोठं आव्हान आहे. याविषयी आचार्य चाणक्य काय सांगतात, जाणून घेऊ या.

खरा मित्र कसा ओळखावा?

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात; ज्यांना आपण मित्र मानतो. पण, चाणक्य सांगतात की, खरा मित्र तोच आहे; जो अडचणीच्या वेळी आपल्याबरोबर असतो. त्यामुळे मैत्री काळजीपूर्वक करावी.
चाणक्य यांच्या मते, जी व्यक्ती फक्त दाखवण्यासाठी तुमच्याबरोबर चांगली वागतो किंवा स्वार्थासाठी मैत्रीचा हात पुढे करते; अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे.

Women of mulank bring luck and success to their husbands
‘या’ मुलांकच्या मुली पतीसाठी असतात खूप लकी, जाणून घ्या, अंकशास्त्र काय सांगते?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
lokrang
पडसाद: तार्किक बुद्धी वापरावी
Dnyaneshwar, Ratnagiri, California,
रत्नागिरी कॅलिफोर्नियापेक्षाही सुंदर; समाजात ज्ञानेश्वरांबरोबर विज्ञानेश्वरही हवेत – ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
loksatta editorial on girl marriage age
अग्रलेख: दहा ते २१!

हेही वाचा : २० दिवसांनंतर या राशींचे लोकं मालामाल होणार? मिळू शकतो अपार पैसा

मिठासारखे असतात खरे मित्र

चाणक्य सांगतात की, खरे मित्र हे मिठासारखे असतात. ते नेहमी सत्य बोलतात. तुमच्या चुका ते बेधडक सांगतात आणि तुम्हाला चांगली व्यक्ती बनविण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. याउलट गोड बोलणारी माणसं अनेकदा स्वार्थापोटी किंवा तुम्हाला खूश करण्यासाठी गोड बोलतात.

मैत्री करण्यापूर्वी पाहा या गोष्टी

कोणत्याही व्यक्तीबरोबर मैत्री करण्यापूर्वी त्या व्यक्तीचा व्यव्हार, विचार व व्यक्तिमत्त्व पाहावे. जर एखादी व्यक्ती त्याच्या हितासाठी दुसऱ्यांचे नुकसान करीत असेल, तर ती व्यक्ती कुणाचाही चांगला मित्र बनू शकत नाही. वाईट संगत असलेल्या मित्रांपासून नेहमी दूर राहा.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)