Rahu Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रामध्ये राहुला छाया ग्रह मानले जाते. छाया ग्रह असून सुद्धा हा ग्रह व्यक्तीच्या आयुष्यावर शनिप्रमाणे परिणाम करतो. राहुला पापी ग्रह सु्द्धा मानले जाते. हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये १८ महिन्यांपर्यंत राहते. अशा राहुच्या स्थितीत बदल झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीवर दिसून येतो.
यावेळी राहु उत्तरा भाद्रपदमध्ये विराजमान आहे. पण वेळो वेळी नक्षत्र पदपरिवर्तन करू शकतो. ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. तो तृतीय पद वरून उत्तरा भाद्रपदच्या द्वितीय पदावर येणार आहे. जाणून घेऊ या राहुच्या नक्षत्र परिवर्तनाचा कोणत्या राशींला लाभ मिळू शकतो.

पंचाननुसार २ डिसेंबर दुपारी ४ वाजून ४ मिनिटांनी राहु उत्तर भाद्रपदाच्या द्वितीय पदामध्ये प्रवेश करणार आहे आणि या पदामध्ये १२ जानेवारी २०२४ पर्यंत विराजमान राहणार आहे. उत्तरा भाद्रपद २७ नक्षत्रांपैकी २६ वे नक्षत्र आहे.या नक्षत्राचा स्वामी शनि ग्रह आहे.

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाी राहुचे नक्षत्र परिवर्तन करणे लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांचे अडकलेले काम पू्र्ण होतील तसेच धन धान्यामध्या वाढ होऊ शकते. या लोकांची मेहनत व काम पाहून यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच या लोकांना मेहनतीचे फळ मिळू शकते.शारीरिक आणि मानसिक तणाव दूर होईल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. घरात सुख शांती नांदेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील.

हेही वाचा : Dhanteras 2024: यंदा कधी आहे धनत्रयोदशी, २९ किंवा ३० ऑक्टोबर? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि सणाचे महत्त्व

तुला राशि (Tula Zodiac)

तुळ राशीच्या लोकांसाठी राहुचा नक्षत्र परिवर्तन फायद्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम पडू शकतो. करिअर किंवा व्यवसायात सुरू असलेल्या समस्या दूर होतील. तसेच हे लोक मानसिकदृष्ट्या सक्षम राहतील. खूप दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होतील.तसेच या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. कमाईचे नवे स्त्रोत दिसून येईल. तसेच खूप काळापासून असलेली आरोग्य समस्या दूर होईल. जीवनात हे लोक समाधानी दिसून येईल.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी राहुचे नक्षत्र परिवर्तन लाभदायक ठरू शकते. या राशीमध्ये राहु अकराव्या भावात विराजमान राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. काही इच्छा पूर्ण करण्याच्या संधी मिळू शकतात. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. जर हे लोक व्यवसायासंदर्भात कोणतीही योजना आखत असेल तर त्यांना यामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहीन. राजकीय क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना यश प्राप्त होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)