ज्योतिष शास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेल्या ग्रहांची स्थिती पाहून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व कळते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराची रचना आणि शरीरावरील खुणावरून, त्याचे भविष्य आणि गुण तसेच स्वभाव जाणून घेता येतो. आज आपण पायाच्या तळव्यांबद्दल बोलणार आहोत. पायांच्या तळव्यांवरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते.

हेही वाचा – शुक्र ग्रह करणार सिंह राशीमध्ये संक्रमण; ‘या’ राशींना येणार अच्छे दिन, प्रत्येक कामात यशाचे योग

concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Shankaracharya Abhinav Shankar Bharti statement that meat consumption is permitted in religious rituals
लोक लौकिक: योग आणि भोग, की दोन्हीही?
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Sadness A Truth
दु:ख : एक सत्य!
Artificial Intelligence Might Enable Communication with Animals
‘जंगल मंगल विद्यापीठा’त कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद भरते तेव्हा…

ज्या लोकांचे पायाचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे असतात. असे लोक खूप भाग्यवान मानले जातात. या लोकांना पैशाची कमतरता नसते. हे लोक श्रीमंत असतात आणि त्यांना प्रवास करायला आवडतं. हे लोक थोडे विनोदी स्वभावाचेही असतात.

हेही वाचा – सामुद्रिक शास्त्र : उजव्या गालावर जन्मखूण असलेल्या तरुणीला मिळतो श्रीमंत पती; तर, कपाळावर जन्मखूण…

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांचे तळवे सपाट असतात. असे लोक मेहनतीच्या जोरावर यश मिळवतात. तसेच ते मनमोकळे असतात. असे लोक स्पष्टवक्ते असतात, त्यांना जे काही बोलायचं असेल ते तोंडावर बोलतात.

सामुद्रिक शास्त्रानुसार पायांच्या टाचांना भेगा असतील तर ते शुभ मानले जात नाही. अशा लोकांना जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण हे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात. हे लोक त्यांच्या मनाचे मालक असतात. तसेच, हे लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात.

हेही वाचा – अशा बोटांच्या मुली खूप भाग्यवान असतात, पतीचे नशीब देखील चमकवतात!

ज्या लोकांच्या पायाचे तळवे पांढरे असतात, असे लोक योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. हे लोक इतरांनी काही सांगितलं तर लवकर विश्वास ठेवतात. ते इतरांच्या बोलण्यात फसतात. पण त्यांना स्वतंत्रपणे जगायला आवडतं.

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या तळव्यामध्ये थोडा काळेपणा असतो, अशा लोकांना जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या लोकांचे आयुष्य संघर्षात जाते. या लोकांना नशिबाची साथही मिळत नाही.

Story img Loader