Sarvartha Siddhi Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हे न्याय व न्याय व कर्मदेवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीला आपापल्या कर्मानुसार फळ देण्याचे काम शनी महाराज करतात असे सांगितले जाते. त्यामुळेच वैदिक ज्योतिष शास्त्रात शनीच्या प्रत्येक हालचालीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शनीदेव सध्या कुंभ राशीत स्थिर आहेत. नवरात्रीच्या नवमी तिथीला शनिदेव मार्गी होणार आहेत. ज्यामुळे काही राशींवर शनीचा उत्तम प्रभाव होऊ शकतो. विशेष म्हणजे शनिदेव मार्गी होताना सर्वार्थ सिद्धी राजयोग सुद्धा जुळून येणार आहे. या एकूण ग्रहमानानुसार ऑक्टोबरच्या शेवटी काही राशींच्या नशिबाला लागलेले टाळे उघडू शकते व त्यांना प्रचंड धनलाभासह प्रगतीचा सुद्धा योग आहे. पंचांगानुसार, २३ ऑक्टोबर २०२३ ला सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी कुंभ राशीतच शनी मार्गी होण्याची सुरुवात होणार आहे तर ३ नोव्हेंबरला रात्री १ वाजून २५ मिनिटांनी शनी मार्गी होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या दोन्ही दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. यानुसार नेमक्या कोणत्या राशीला या शनी बदलाचा फायदा होऊ शकतो हे पाहूया.. सर्वार्थ सिद्धी योगातच शनी मार्गी, 'या' राशींना प्रचंड लाभाचे संकेत मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya) मिथुन राशीला शनी ग्रह मार्गी झाल्याने अनुकूल वातावरण अनुभवायला मिळणार आहे. धार्मिक कार्यांमधील तुमची आवड वाढू लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तुमच्या कुंडलीत संतती सुखाचे संकेत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सहनशीलता वाढवावी लागेल हे लक्षात ठेवा. कायद्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट असो, नियमांच्या चौकटीत राहा. तूळ रास (Libra Rashi Bhavishya) तूळ राशीच्या पंचम स्थानी शनी मार्गी होऊन प्रभावी असणार आहे. अशावेळी तुम्हाला कौटुंबिक सुख प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. महिलांसाठी संघर्षदायक वातावरण कमी होईल. तुमच्या कामाचे नियोजन नीट करून मग त्यानुसारच कृती करा अन्यथा वेळेचा अपव्यय होण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी ज्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता तो आता करावा लागणार नाही. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील. आर्थिक मदत मिळेल. हे ही वाचा<< ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रचंड पैसे कमावतील ‘या’ राशी; शनी- बुधाचे नक्षत्र परिवर्तनाने तुमच्या कुंडलीत काय बदलणार? मकर रास (Capricorn Rashi Bhavishya) व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात न झेपणारी जबाबदारी घेऊ नका. संततीसौख्य लाभेल. योग्य ठिकाणी गुंतवणुकीवर भर द्या. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील त्यामुळे आपल्या मनात कोणतीही अढी न ठेवता सर्वांशी खुलून बोलणे फायद्याचे ठरू शकते. मानसिक चलबिचलता वाढवू नका. मदत मागायला लाजू नका. (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)