ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. ग्रहाने राशी बदलली की त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. त्यामुळे वैदीक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला महत्त्व आहे. चंद्र ग्रह दर सव्वा दोन दिवसांनी रास बदलतो. तर शनि ग्रह अडीच वर्षांनी रास बदलतो. यामुळे कधी कधी ग्रहांचा एकाच राशीत संयोग पाहायला मिळतो. शनि ग्रह अडीच वर्षांनंतर म्हणजेच २९ एप्रिल २०२२ रोजी राशी बदल करणार आहे. शनि ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीसह मागच्या पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. आता शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा तर मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर धनु राशीचा साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर तूळ आणि मिथून राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यांनाही २९ एप्रिलनंतर दिलासा मिळणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा