Ardhakedra Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते आणि गुरू ग्रहाला देवतांचे गुरू म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात या दोन्ही ग्रहांना शुभ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यामुळे हे ग्रह जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान, सुख-समृद्धी प्राप्त होते. सध्या सूर्य मेष राशीत विराजमान असून गुरू वृषभ राशीत विराजमान आहे. येत्या २५ एप्रिल रोजी हे दोन्ही ग्रह अर्धकेंद्र योग निर्माण करत आहेत. दोन्ही ग्रहांच्या या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.

अर्धकेंद्र योग कसा निर्माण होतो?

जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असल्याने हा योग निर्माण होतो. ज्याला अर्धकेंद्र योग म्हटले जाते. २५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी सूर्य आणि गुरू एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील.

‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि गुरू या ग्रहांनी निर्माण केलेला अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर असेल. या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील.

मिथुन (Mithun Rashi)

हा योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात यश मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल.

वृश्चिक (Vrushchik Rashi)

वृश्चिक राशीसाठी देखील हा योग अनेक बदल घडवून आणेल. या काळात मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. जोडीदाराची प्रत्येक गोष्टीत साथ मिळेल. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. प्रत्येक कामात अग्रेसर असाल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)