ज्योतिष शास्त्रानुसार १५ मे चा दिवस खूप महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी दोन ग्रह एकत्र चाल बदलणार आहेत. सूर्यदेव मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत तर बुधदेव मेष राशीत जाणार आहेत. सूर्य आणि बुध यांनी चाल बलल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. शिवाय या काळात काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. तर १५ मे पासून अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता असणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष –

सूर्य आणि बुध या ग्रहांनी चाल बदलामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ फळाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद तर कामातही यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच या काळात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे.

वृषभ –

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत आता दोन वर्ष फक्त…” सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर ज्योतिषतज्ज्ञांची महत्त्वाची भविष्यवाणी

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरु शकतो. या काळात तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची होण्याची शक्यता आहे. तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळू शकते तसेच या काळात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

मिथुन –

सूर्य आणि बुध या ग्रहांनी चाल बलाच्या काळात मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच या वेळी तुम्हाला प्रचंड धनलाभ होईल. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. तर नोकरी व्यवसायासाठी ही वेळ शुभ ठरु शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya rashi parivartan budh gochar from may 15 the fate of these zodiac signs will change chance of wealth from suryadev jap
Show comments