ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी ३० दिवस घेतो. दर महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. १६ जुलै रोजी पुन्हा एकदा सूर्य आपली राशी बदलून कर्क राशीत प्रवेश करेल आणि १७ ऑगस्टपर्यंत येथेच राहील. तसे, सूर्याच्या या बदलाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. पण हा प्रभाव काही राशींवर शुभ तर काहींवर अशुभ असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याचा हा राशी बदल तीन राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यांचे नशीब सूर्यासारखे चमकू शकते. या राशीच्या लोकांवर महिनाभर सूर्य देवाची कृपा राहील. या राशी कोणत्या आहेत आणि त्यांच्यासाठी हा महिना किती फायदेशीर असणार आहे ते जाणून घेऊया.

  • मेष

ज्योतिष शास्त्रानुसार १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. पगारदार लोकांना या काळात बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. एवढेच नाही तर तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. तुम्ही व्यवसाय इत्यादीमध्ये मोठी डील फायनल करू शकता आणि ते फायदेशीर ठरेल.

१० दिवसानंतर होणाऱ्या शुक्राच्या संक्रमणामुळे बदलणार ‘या’ चार राशीच्या लोकांचे नशीब; मिळेल मान-प्रतिष्ठा

  • वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ खूप शुभ राहील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असाल, तर सूर्य संक्रमणादरम्यान तुम्हाला चांगली पगाराची नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवासात लाभ होण्याची शक्यता आहे.

  • मिथुन

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचे नशीब देखील सूर्यासारखे चमकताना दिसेल. सूर्याचे राशी परिवर्तन शुभ काळ घेऊन येणार आहे. या काळात स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे. पगारदारांना या काळात पदोन्नती मिळण्याची किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. धनलाभ होईल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या लोकांना फायदा होईल.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader