Trigrahi Yog in Mithun: ज्योतिषशास्त्रात नवग्रह महत्त्वाचे मानले जातात. हे सर्व ग्रह विशिष्ट कालावधीनं आपापलं राशी स्थान बदलत असतात. या स्थान बदलाला प्रचंड महत्त्व असतं. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या राशीबदलाचा चांगला-वाईट परिणाम सर्वच राशींवर होत असतो. या जून महिन्यात अनेक ग्रहांनी राशी परिवर्तन केलं आहे. यात सूर्य, बुध आणि शुक्रदेवाचा समावेश आहे. १२ जूनला शुक्रदेवाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे तर १४ जूनला बुधदेवाने आणि १५ जूनला सुर्यदेवाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे तब्बल १०० वर्षांनी मिथुन राशीत ‘त्रिग्रही योग’ निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता असते. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे चमकणार भाग्य?

मेष राशी

त्रिग्रही योगाची निर्मिती मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींच्या कामातले अडथळे दूर होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. धन-संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कामात चांगले परिणाम दिसून येऊ शकतात. या राशीच्या लोकांना सुखद बदल दिसू शकतात. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. या काळात तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळू शकते.

(हे ही वाचा: १५ दिवसांनी ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? शुक्रदेवाच्या कृपेने चारी बाजूंनी होऊ शकते धनवर्षा )

मिथुन राशी

मिथुन राशीतच त्रिग्रही योग बनल्याने या राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ होऊ शकतो. या राशीतील लोकांचा खिसा सतत पैशाने भरलेला राहू शकतो. थांबलेली कामे मार्गी लागू शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीत पगार वाढण्याचीही शक्यता आहे. एवढंच काय तर नवीन नोकरीची ऑफर येण्याचीही शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना त्रिग्रही योग बनल्याने या काळात चांगली बातमी मिळू शकते. मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. व्यवसायात तुमची प्रगती होण्याची शक्यता असून मोठा नफा मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन समाजात तुमची प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही त्यांना लग्नाचं चांगलं स्थळ येऊ शकते. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)