प्लॉट खरेदी करणे ही एक मोठी जबाबदारी आहे कारण प्लॉट खरेदी करताना वास्तुशी संबंधित झालेल्या कोणत्याही चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्लॉट खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा तो प्लॉट विकत घेणे किंवा विकणे योग्य नाही.

जमिनीच्या दक्षिणेला विहीर असणे अत्यंत धोकादायक आहे, अशा प्लॉटमध्ये अपघाती घटना घडतात आणि मालकाकडे कधीही संपत्तीचा संचय होत नाही. भूखंडाचे कोन काटकोन असणे चांगले असते. प्लॉटच्या ईशान्य दिशेला कोपरा वाढवणे शुभ आहे, तर दक्षिण आणि पश्चिम कोपरा वाढवणे अशुभ आहे.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
how to protect and lock your aadhaar card
तुमचं आधार कार्ड सुरक्षित आहे का? लॉक करण्यासाठी अन् गैरवापर टाळण्यासाठी काय करायचं? जाणून घ्या…

प्लॉटच्या आकृत्यांमध्ये आग्नेय म्हणजे दक्षिण-पश्चिम दिशेला वाढलेला कोनाचा आकार अशुभ मानला जातो. प्लॉट खरेदी करायला गेल्यावर दक्षिणेत वाढीव जमीन घेऊ नये. जर असा प्लॉट आधीच असेल तर तो एकतर सोडून द्यावा किंवा तो सांगितलेल्या दिशेने काटकोनात बनवला पाहिजे. या प्लॉटची सोडलेली जमीन कोणाला तरी दान करावी. कारण या भूखंडाची विक्री करणे शास्त्रातही निषिद्ध आहे. ईशान्यच्या अतिरिक्त आग्नेय, वायव्यमध्ये वाढलेल्या भूखंडाला काटकोनामध्ये परिवर्तित करून उरलेला भाग विकू शकता.

‘या’ राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार यश, प्रमोशनचीही शक्यता; जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य

त्याचप्रमाणे, प्लॉटचा कोणताही कोन कापला जाऊ नये हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कोनांच्या वाढीने संबंधित देवतांची शक्ती वाढते, त्याचप्रमाणे कोनांच्या क्षरणामुळे संबंधित देवतांची शक्ती कमी होते. कोणत्याही कोनात घट झाल्यास भूखंड चौकोनी राहत नाही आणि अशा भूखंडावरील बांधकामाचा वास्तुशास्त्रात निषेध करण्यात आला आहे.

या नियमाला एक अपवाद देखील आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की जर प्लॉट नैऋत्य कोनातून कापला असेल तर त्यावर बांधकाम करणे आणि राहणे अशुभ नाही. नैऋत्य कोनाचा अधिकार राहुकडे आहे, ज्याला आसुरी शक्ती प्राप्त झाली आहे, हेही कारण स्पष्ट आहे. अनेक प्रकारे वाईटाचे कारणही हेच आहे. त्यामुळे नैऋत्य कोनाला छेद दिल्यास राहूची शक्ती कमी होते. अशा निवासस्थानात राहणारे लोक अंधश्रद्धेपासून मुक्त राहतात. अडथळ्यांची भीती नाही, मन मलिन होत नाही. राहू शक्तिहीन असल्यामुळे आत्मविश्वासात खूप वाढ होते. हा कोन कमी झाल्यामुळे वास्तुपुरुषाच्या डोक्यापेक्षा पाय लहान होतात, हे शुभ चिन्ह मानले जाते.

माणसाच्या सभोवताली जशी आभा असते, त्याचप्रमाणे जमिनीवर वेगवेगळी कंपने असतात. वेगवेगळ्या लहरी आहेत आणि त्यामागे काही दृश्य आणि अदृश्य कारणे आहेत. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीवर स्मशानभूमी असेल, तर अशा जमिनीचे कंपन योग्य नाही. अशा जमिनीवर राहणे उचित नाही. दवाखाना, तुरुंग, पोलीस ठाणे किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे गेली अनेक वर्षे दु:खाचे वातावरण होते आणि आता तुम्ही तिथे घर बांधणार असाल, तर लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी कित्येकवर्षे दुःखाच्या लहरी प्रसारित झाल्या आहेत, तिथे तुम्हाला शांती लाभण्याची शक्यता कमी आहे.

संध्याकाळच्या वेळी घरात झाडू मारण्यास का केली जाते मनाई? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण

प्लॉटमध्ये विहीर किंवा पिंपळाचे झाड असणे चांगले नाही. अशा प्लॉटचे मुख्य गेट वास्तूनुसार बनवता येत नसेल किंवा दारासमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल, तर शक्यतोवर या प्लाॅटता त्याग करावा. प्लॉटचा ईशान्य भाग कमी आणि नैऋत्य भाग जास्त असेल तरच शुभफळात वाढ होते हे लक्षात ठेवा. जमिनीच्या दक्षिणेला विहीर असेल तर ती अशुभ असते. या घरात अपघात होतात. अशा प्लॉटमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची संपत्ती कधीही संचित होत नाही.

प्लॉट घेतल्यानंतर बांधकाम करताना कोणत्या मुहूर्तावर कोणत्या ठिकाणाहून बांधकाम सुरू करायचे याचीही खातरजमा करणे आवश्यक आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी, जमीन चाचणी प्लॉट साफ करणे आवश्यक आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader