आपला हिंदू धर्म अनेक प्राचीन मान्यतांवर आधारित आहे. शास्त्रांमध्ये अनेक अशा गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे ज्यांचा संबंध आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित आहे. या मान्यता कित्येक काळापासून चालत आल्या आहेत. जसे की संध्याकाळी तुळशीला हात लावू नये, रात्रीची नखे कापू नयेत, इत्यादी. अशीच एक मान्यता म्हणजे रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. आज आपण जाणून घेऊया यामागे कोणते कारण आहे.

प्रत्येक मान्यतेच्या मागे काही ना काही धार्मिक कारण सांगण्यात येते. जसे, आपण सर्वांनीच वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारू नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. परंतु यामागील शास्त्रीय कारण म्हणजे, पूर्वीचे लोक लालटेन किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात कामे करत असत. यावेळी जर एखादी मौल्यवान वस्तू घरात कुठे पडली, तर ती शोधणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत घरात झाडू मारल्यास ती वस्तू झाडूच्या माध्यमातून घराबाहेर जाण्याची भीती होती. या कारणांमुळे, पूर्वीच्या लोकांनी ते नियम म्हणून स्वीकारले आणि दिवसानंतर झाडू मारण्यास मनाई केली.

navi mumbai municipal corporation beggars loksatta news
नवी मुंबई : शहरात भिकाऱ्यांचा उपद्रव; पालिका, पोलीस प्रशासन उदासीन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
pimpri leopard news in marathi
पिंपरी : निगडीत बिबट्याचा शिरकाव; अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Anand Anil Khode from Akola will lead commanding procession of All India NCC Parade in Delhi
अकोल्यातील आनंदचे दिल्लीमध्ये संचलनात नेतृत्व, सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाचे नेत्रदिपक यश
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Piyush Goyal urged taking garbage photos and sending them to Municipal Corporation for action
कचरा दिसताच छायाचित्र काढा आणि तक्रार करा, खासदार पीयूष गोयल यांचे नागरिकांना आवाहन

Akshaya Tritiya 2022 : जाणून घ्या या वर्षी कोणत्या दिवशी आहे अक्षय तृतीया; लग्न कार्यासाठी आहे शुभ मुहूर्त

याशिवाय एक मान्यता अशीही आहे की लोक सकाळीच घर स्वच्छ करून सजवत असत. त्यामुळे दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते आणि सूर्यास्तानंतर जर घर झाडून घेतलं तर ही सकारात्मक ऊर्जा झाडूसोबत घरातून बाहेर पडते.

शास्त्रांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये दिवसाच्या चार प्रहरांमध्ये घर झाडण्याची वेळ सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री घर झाडून घेतल्याने घरात दरिद्रता येते. वास्तुशास्त्रात असंही वर्णन आहे की संध्याकाळी झाडू मारल्याने आणि घरात कचरा साचल्याने घराच्या प्रगतीत अडथळे येतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader